मुंबई : चालू आर्थिक वर्षांत महसुली तूट ३१ हजार ४४३ कोटींवर गेली. मात्र पुढील वर्षांत हीच तूट ९५११ कोटी एवढी अपेक्षित धरण्यात आली. एवढी तूट कशी भरून काढणार याचे काहीही उत्तर देण्यात आलेले नाही. सारे काही चांगले होईल या आशेवरच ही तूट भरून निघेल, असा अंदाज वर्तविण्यात आला. एकूणच आकडय़ांचा खेळ करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याच्या करात सरासरी १२ टक्क्य़ांची वाढ होते. पण पुढील वर्षी ही वाढ २५ टक्क्य़ांच्या आसपास गृहीत धरण्यात आली. नैसर्गिक आपत्ती आल्यास राज्याच्या तिजोरीवर ताण पडतो. गेली काही वर्षे सातत्याने आपत्तींशी सामना करावा लागतो. आर्थिक परिस्थिती मंदावल्याचा फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसला. राज्य वस्तू आणि सेवा कराचे यंदा १ लाख दोन कोटींचे उद्दिष्ट गृहीत धरण्यात आले होते. प्रत्यक्षात ८६ हजार कोटीच वसूल होण्याची चिन्हे आहेत. १६ हजार कोटींचा फटका बसणार आहे. कॉर्पोरेट करातही अडीच हजार कोटींची तूट अपेक्षित आहे. फक्त मुद्रांक आणि उत्पादन शुल्क विभागाने हात दिला. उत्पन्न घटल्याने विभागांच्या तरतुदींमध्ये कपात करावी लागली. चालू आर्थिक वर्षांत ही परिस्थिती असतानाही पुढील वर्षांत परिस्थिती बदलेल हा व्यक्त करण्यात आलेला अंदाज अभासी मानला जातो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra budget 2020 maharashtra revenue deficit increased zws
First published on: 07-03-2020 at 04:41 IST