मुंबई : मागील काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रासह देशामध्ये क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने तातडीने क्षयरोगावरील औषधे खरेदीची प्रक्रिया सुरू केली. मात्र आजही फोर-एफडीसी आणि थ्री-एफडीसी या प्रकारातील औषधांचा साठा एक महिनाच पुरेल इतकाच उपलब्ध आहे. ही औषधे मार्च किंवा एप्रिल अखेरपर्यंत पुरेल इतकाच साठा असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही, तर केंद्र सरकारच्या ‘क्षयरोगमुक्त भारत’ योजनेला खीळ बसण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असले तरी ही औषधे स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नसल्याने राज्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

हेही वाचा >>> धारावीतील बहुमजली झोपड्यांसाठी विकास नियंत्रण नियमावलीत विशेष तरतूद?

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra have one month stock of tb medicines mumbai print news zws
First published on: 20-03-2024 at 22:20 IST