लग्न ही काही आयुष्यभरासाठीची गोष्ट नाही, असे उद्गार बॉलीवूड अभिनेता सलमान खान याने काढले आहेत. ‘बिग बॉस-९’ या कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत तो बोलत होता. यावेळी पत्रकारांकडून सलमानला लग्नाविषयी छेडण्यात आले. तुझ्याबाबतीत एकाचे दोन (डबल) कधी होणार, असा सवाल यावेळी सलमानला विचारण्यात आला. या प्रश्नाला मिष्कीलपणे उत्तर देताना सलमान म्हणाला की, मी तर ‘मैने प्यार किया’नंतरच ‘डबल’ झालो होतो (शरीरयष्टीने) आणि आणि आता ‘सुलतान’च्या वेळेपर्यंत ट्रिपल झालोयं. याशिवाय, आजच्या जमान्यात लग्न ही आयुष्यभर टिकणारी गोष्ट राहिलेली नाही. हल्ली असले काही घडतच नसल्याचे सलमानने सांगितले. मी तात्पुरते लग्न करावे की कायमचे, याबाबतीत मी काय करावे असे तुला वाटते, असा सवालही सलमानने यावेळी एका पत्रकाराला विचारला. मात्र, जेव्हा या पत्रकाराने सलमानला लग्न न करण्याचा सल्ला दिला तेव्हा सलमान म्हणाला की, काहीजण मला सांगतात लग्न कर आणि काहीजण सांगतात लग्न करू नकोस. त्यामुळे तुम्ही सगळे मला लग्नासाठी तयार करताय की मला लग्नापासून परावृत्त करताय, हाच प्रश्न मला पडत असल्याचे सलमानने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marriage is not for lifetime salman khan
First published on: 30-09-2015 at 14:49 IST