मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारे गोपाळकृष्ण गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला पूल यांची जोडणी विविध कारणांमुळे रखडली आहे. त्यामुळे सध्या या बर्फीवाला पुलाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर उच्चभ्रू वस्तीतील रहिवाशांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी करत आहेत. तसेच क्रिकेट खेळण्यासाठी, बेघरांना झोपण्यासाठी, तर कपडे वाळत घालण्यासाठी या पुलाच्या पोहोच रस्त्याचा वापर केला जात आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक ठरल्यामुळे नोव्हेंबर २०२२ मध्ये वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर या पुलाचे पाडकाम, बांधकाम सुरू झाले. गेली दोन वर्षे ते सुरू आहे. अजूनही हे काम पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. हा पूल बंद असल्यामुळे अंधेरी पश्चिमेला असलेला जुना बर्फीवाला पुलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

peacocks die of electrical shock in bhadravati city
चंद्रपूर : सर्वांना भुरळ घालणाऱ्या मोराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Liquor bottles, Dombivli East Railway Station,
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारावर दारूच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिक पिशव्या, दुर्गंधीने पादचारी हैराण
Ice cream made from raw eggs
कच्च्या अंड्यांपासून बनवले जाणारे आईस्क्रीम आरोग्यासाठी योग्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात..
tiger viral video loksatta
Video: हक्काच्या घरासाठी वाघाचे ‘चिपको’ आंदोलन…व्हिडीओ एकदा बघाच…
potholes roads Mumbai, Mumbai,
मुंबईतील रस्त्यावर आतापर्यंत १६ हजार खड्डे बुजवले, गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी पालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला
eat top 10 food items to maintain a good health in rainy season
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘हे’ दहा पदार्थ आवर्जून खा
Wildlife Deaths On railway tracks,
विश्लेषण : वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी ‘आसाम पॅटर्न’?

हेही वाचा – ४३ टक्के मराठा महिला मजूर; मागासवर्ग आयोगाचा अहवाल; सरकारी नोकऱ्यांतील प्रतिनिधित्वही कमी

गोखले पुलाची एक बाजू सुरू झाली असली, तरी सी. डी. बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांची पातळी नवीन बांधकामामुळे वरखाली झाली आहे, तसेच त्यात अंतर पडले आहे. त्यामुळे हे दोन पूल कसे जोडायचे याबाबत उच्चस्तरीय खल सुरू आहे. मात्र, या काळात बर्फीवाला पूल हा काही नागरिकांसाठी हक्काची जागा बनला आहे. या पुलाच्या पोहोच रस्त्याचा भाग हा या परिसरातील नागरिकांनी व्यापला आहे.

हेही वाचा – मतटक्का वाढवण्याचे लक्ष्य; आयोगाला मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरबाबत चिंता; जनजागृतीवर भर

हक्काचे वाहनतळ, नागरिकांना त्रास

या पुलाच्या पोहोचमार्गावर गाड्या, ट्रक उभे केले जातात, तर कधी परिसरातील मुले तेथे क्रिकेट खेळतात. आजूबाजूच्या झोपडपट्टीतील रहिवासी पुलाच्या कठड्यावर कपडे वाळत घालतात, उच्चभ्रू वसाहतींमधील रहिवाशांच्या मोटारगाड्यांसाठी हे हक्काचे वाहनतळ झाले आहे. तर जवळच असलेल्या चारचाकी गाडीच्या एका शोरुमच्या गाड्याही इथे उभ्या असतात. त्यामुळे हा एक वेगळाच त्रास या परिसरातील नागरिकांना होऊ लागला आहे. पुलाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा त्रास आणि या मार्गाचे विद्रुपीकरण सुरू राहणार का असा सवाल अंधेरी लोखंडवाला रहिवासी संघटनेचे धवल शाह यांनी केला आहे.