मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईत चोख बंदोबस्त ठेवला असून सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत आदेश जारी करण्यात आले आहेत. मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास मतदारांना बंदी घालण्यात आली आहे. याची कोटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा >>> इथेनॉलवरील निर्बंध केंद्राकडून मागे; तेल कंपन्यांकडून लवकरच खरेदी

Flood water in the Mohili Water Purification Center of the Kalyan-Dombivli Municipality
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या मोहिली जलशुध्दीकरण केंद्रात पाणी, पुराचे पाणी ओसरेपर्यंत उपसा पंप बंद
new access controlled route project to link major cities in mmr area
विश्लेषण : ठाणे, मुंबई, नवी मुंबईला ‘चौथी मुंबई’ जोडण्यासाठी नवा रस्ता? काय आहे हा प्रकल्प? 
Special campaign of health department in problem areas for epidemic control Mumbai
साथरोग नियंत्रणासाठी समस्याग्रस्त भागांत आरोग्य विभागाची विशेष मोहीम!
Tarapur Atomic Power Station, safety,
शहरबात : सुरक्षिततेबाबत चिंता
Nashik city, Nashik city to Experience Complete Water Shutdown, water shutdown in nashik, nashik news,
नाशिक : शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद
water, railway tracks, waterlogged places,
रेल्वे रुळांवर पाणी का साचले? पावसात पाणी साचलेल्या ठिकाणांचा अभ्यास करून यंत्रणा सज्ज ठेवा, पालिका प्रशासनाचे आदेश
Citizens of Dombivli West travel on gravel roads Neglect of MMRDA Public Works Department
डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांचा खडीच्या रस्त्यांवरून प्रवास; एमएमआरडीए, सार्वजनिक बांंधकाम विभागाचे दुर्लक्ष
Traffic Indiscipline Soars in Nashik, Automatic Signals in nashik, Traffic Police to Enforce Stricter Measure in nashik, e chllan in nashik, e challan, e challan penalty, nashik news,
नाशिक : बेशिस्त वाहनचालकांना लवकरच इ चलनव्दारे दंड

मुंबई शहर जिल्ह्यात २५२० मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाइल अथवा वायरल यंत्रणा नेण्यास बंदी आहे. याशिवाय परिसरात बॅनर, ध्वनिक्षेपक, मेगाफोनचा वापर करण्यासही बंदी आहे. पोलीस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी बुधवारी याबाबतचा आदेश जारी केला. २० मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील. याशिवाय मतदान केंद्र परिसरात मतदार व निवडणूक आयोगाचे अधिकारी वगळता इतर कोणीही व्यक्ती घुटमळणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल बंदी का?

मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्याबाबत सर्व पोलिसांना सूचना करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.