मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचारात जाहीरनाम्यातीलच मुद्दे मांडले असून, त्यामुळे आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग झालेला नाही, असे स्पष्टीकरण भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीत प्रत्येक पक्षाला आपला जाहीरनामा सांगण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर मतदारसंघातील प्रचारात भाजपच्या जाहीरनाम्यातीलच काही मुद्दे मांडले. या मुद्यांचे सूतोवाच त्यांनी निवडणुकीपूर्वीही केले आहे. त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची काँग्रेस उमेदवाराच्या प्रतिनिधीची तक्रार पूर्णपणे चुकीची असल्याचे केशव उपाध्ये यांनी सांगितले.

पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचारात जनतेचा प्रतिसाद मिळत असून त्यामुळे भाजपचाच उमेदवार विजयी होईल हे स्पष्ट असून मुख्यमंत्र्यांच्या सभेत याची खात्री पटली. त्यामुळे

निराश झालेले विरोधक निर्थक मुद्दे काढून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे मतदार कोणत्याही प्रकारे विचलित होणार नाहीत आणि विकासाच्या मुद्यावर भाजपलाच पाठिंबा देतील असेही उपाध्ये म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No violation of code of conduct by cm devendra fadnavis says keshav upadhye
First published on: 24-05-2018 at 04:05 IST