देशाच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण आहे. याच विजयाची प्रतीक्षा लोकांना होती. देशाला समर्थ नेतृत्वाची गरज होती. नरेंद्र मोदी यांच्यासारखा चेहरा आम्ही दिला. जनतेने  भरभरून मतदान केल्यामुळे मोदी यांच्या रुपाने समर्थ नेतृत्व मिळाले आहे. आता विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्राची सत्ता आम्ही घेऊ, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
या निवडणुकीत आम्हाला आडवे जाण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. त्या सर्वाना मी माफ करतो, असे सांगत यापुढे आडवे जाऊ नका, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now we will win maharashtra assembly uddhav thackeray
First published on: 17-05-2014 at 05:55 IST