काँग्रेस नेते राहुल गांधींनी भारत जोडो पदयात्रे दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून सध्या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने राहुल गांधींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधींच्या विधानानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा – “जे स्वत:च्या वडिलांचे विचार विसरले ते इतिहास विसरले तर नवल ते काय?” ; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

dhananjay munde criticized sharad pawar
सुनेत्रा पवारांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून धनंजय मुंडेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “कुणी आपल्या सुनेला परकं म्हणत असेल, तर…”
Rahul gandhi
अमरावतीतून राहुल गांधींची महिलांसाठी मोठी घोषणा, दरवर्षी मिळणार एक लाख रुपये; योजनेविषयी म्हणाले, “गरिबांची यादी…”
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
aditya thakceray on shinde group candidate change
“ज्यांनी दिली साथ, त्यांचा केला घात; हेच शिंदे गटाचं ब्रीदवाक्य”, उमेदवार बदलण्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…

पत्रकारपरिषदेत बोलताना आशिष शेलार यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांविषयी लिहिलेल्या एका पत्राचा दाखला देत शेलारांनी राहुल गांधीवर निशाणा साधला.

हेही वाचा – “शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार कोणी मांडू नये; विचार व्यक्त करायला कृती असावी लागते”; उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा!

आशिष शेलार म्हणाले, “ राहुल गांधीचं विधान हे खरा इतिहास लपवणारं आहे. जर अर्ध वाचलेलं पत्र राहुल गांधी देशासमोर दाखवणार असतील, तर काँग्रेस नेतृत्वाला आणि राहुल गांधींना हेही इंदिरा गांधी यांचं पत्र वाचावं लागेल. हे पत्र स्वत: तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लिहिलेलं पत्र आहे. इंदिरा गांधी असं लिहितात, भारताचे सुपुत्र हे सावरकर आहेत. त्यांचा उल्लेख वीर सावरकर म्हणून त्या करतात. ज्या वीर या शब्दावर स्वत: राहुल गांधी भाषणामध्ये ताशेरे ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी त्यांच्या आजीचं पत्रही वाचलेलं नाही. पुढे इंदिरा गांधी म्हणतात, सावरकरांचं युद्ध अतिशय धाडसी होतं. ब्रिटिश सरकारच्या विरोधातील युद्धात त्याची नोंद इतिहासात होईल, असं कार्य सावरकरांनी केलं आहे.”

हेही वाचा – पश्चिम बंगालमध्ये भर कार्यक्रमात नितीन गडकरींना भोवळ

याचबरोबर “राहुल गांधी यांनी नेहरुंना वाचलेलं नाही, इंदिरा गांधींचा अभ्यास केलेला नाही. आता केवळ केरळमधून निवडून आल्यानंतर हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मतं, एवढ्या पुरताच त्यांनी अभ्यास केलेला दिसतोय. म्हणून त्यांचं विधान म्हणजे बेअक्कलपणा आहे. राहुल गांधींचं विधान हा बेअक्कलपणा आहे म्हणून त्याचा आम्ही निषेध करतो.” असंही यावेळी शेलार यांनी म्हणत राहुल गांधींवर टीका केली.

हेही वाचा – “…ते पाहिलं की असं वाटतं त्यांनी या स्मृतिस्थळावर येऊच नये”; अरविंद सावंतांचा शिंदे गटावर निशाणा!

याशिवाय, “हे इंदिरा गांधींचं पत्र मी तुम्हाल देतो, सावरकरांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या कार्यक्रमात इंदिरा गांधी याव्यात या अपेक्षने लिहिलेलं हे पत्र आहे. त्याला उत्तर देताना इंदिरा गांधींनी संपूर्ण शब्द विचार करून लिहिले आहेत, असं आमचं मत आहे.” असंही शेलारांनी माध्यमांशी बोलताना शेवटी सांगितलं.