केंद्र सरकारने राज्य सरकारच्या हातात हात घालून मुंबईचा विकास करण्यासाठी ‘मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पा’ची (एमयूटीपी) आखणी केली. शहरातील वाहतूक विषयक अनेक कामे मार्गी लागावी, यासाठी या प्रकल्पाचे टप्पेही आखण्यात आले. त्यापैकी फक्त पहिला टप्पाच पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यातील अनेक योजना अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. तिसऱ्या टप्प्याला निती आयोगाची मान्यता मिळाली असली, तरी या प्रकल्पातील योजनांचा आवाका लक्षात घेता हा टप्पा पूर्ण होण्यासही खूप कालावधी लागणार आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवडय़ात एमयूटीपी-३मधील प्रकल्पांना निती आयोगाची मान्यता मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि मुंबईकरांसाठी आणखी काही प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली. कळवा-ऐरोली उन्नत जोड रेल्वेमार्ग, विरार-डहाणू चौपदरीकरण, विरार-वसई-पनवेल या मार्गाचे दुपदरीकरण अशा महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश असलेल्या या योजनेतून हार्बर मार्गावर कॅब बेस्ड् सिग्नल यंत्रणा वगळण्यात आली आहे. तरीही या प्रकल्पांना आता निती आयोगाची मान्यता मिळाल्याने प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधीची ददात मिटणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway project in mumbai
First published on: 07-09-2016 at 05:39 IST