‘मला गद्दार म्हणत मला पाकिस्तानात जाण्यास सांगितले. मला अर्थात दु:ख झालं. परंतु जातीय किंवा धार्मिक हिंसेच्या घटनांमधील पीडितांना खूप सहन करावे लागले आहे. त्यांच्या दु:खापुढे माझे दु:ख काहीच नाही. मी त्यांच्या हिमतीला दाद देतो,’ अशा भावना ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी रविवारी व्यक्त केल्या.

भारतीय लोकशाही युवा संघटनेतर्फे (डीवायएफआय) आयोजित परिषदेत जातीय किंवा धार्मिक हिंसाचाराचे बळी ठरलेल्या कुटुंबांच्या अनुभव कथनानंतर शहा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ‘देशभरातील वाढत्या झुंडबळीच्या घटना आणि द्वेषाचे राजकारण’ या विषयावर ही परिषद झाली.

Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Gujarat Freedom of Religion Act
हिंदू अन् बौद्ध धर्म वेगळा, आता धर्मांतरासाठी परवानगी घ्यावी लागणार; गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा काय सांगतो?
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
ajit pawar and supriya sule
स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा

‘गेल्या पाच वर्षांपासून मी न्यायासाठी झगडतो आहे, मात्र नितीनला अजूनही न्याय मिळत नाही.   सर्वच सरकारी यंत्रणांची हातमिळवणी असल्याची जाणीव पदोपदी होत आहे,’ अशी वेदना नगर येथे जातीय विद्वेषातून खून झालेल्या नितीन आगे या अल्पवयीन मुलाचे वडील राजू आगे यांनी व्यक्त केली. हरियाणा येथे रेल्वेत सामूहिक हिंसेचा बळी ठरलेल्या जुनैद खान यांचे कुटुंबीय मोहम्मद नफीस आणि मोहम्मद कासम यांनीदेखील त्यांचा अनुभव सांगितला. ‘माझ्या सोळा वर्षांच्या भावाची टोळक्याने चाकूने वार करून हत्या केली. त्यावेळी रेल्वेत बरेच लोक उपस्थित होते. त्यातील एकही व्यक्ती पुढे आली नाही.   देशातील जनता सरकार निवडून देते. त्यामुळे सरकारने फक्त एका समुदायासाठी अथवा धर्मासाठी काम न करता सर्वाच्या हक्कासाठी काम करावे हे संविधानात अपेक्षित आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती गोपाल गौडा यांनी स्पष्ट केले.