मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून चेंबूर परिसरातील डोंगरावर वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना पाण्याची तीव्र चणचण भासत असून मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयात अनेक वेळा तक्रारी केल्यानंतरही पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी वरळी येथील जल अभियंत्यांच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

चेंबूरमधील महानगरपालिकेच्या एम पूर्व विभाग कार्यालयाच्या हद्दीतील भारत नगर, रायगड चाळ, मास्तर चाळ, गणेश चाळ, एमजी केमिकल, भीम टोला या भागात गेल्या अनेक महिन्यापासून तुटपूंजा पाणीपुरवठा होत आहे. या भागात झोपडपट्टी असून डोंगरावर मोठी लोकवस्ती वसली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रहिवाशांना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. परिणामी, नागरिकांना डोंगरच्या पायथ्याशी जाऊन पाणी आणावे लागत आहे.

gym trainer, Kalyan, bandhara,
कल्याणमधील जीम ट्रेनर तरुण शहापूरजवळील बंधाऱ्यात बेपत्ता
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
CIDCO is in the process of giving land at a strategic location in Airoli sector to a large industrial group for the construction of a township
ऐरोलीतील मोक्याची जागा बड्या उद्याोगपतीला? टाऊनशिप उभारणीच्या नावाखाली ‘सिडको’चे अजब धोरण
Canal form in Nashik to flyover on Mumbai-Agra highway
मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलास नाशिकमध्ये कालव्याचे स्वरुप, तोडगा कसा निघणार?
The dams supplying water to Mumbai are more than 98 percent full
लेख: मुंबईला पाण्याची चिंता हवी; पण कशी?
nmmc providing clean pure water to navi mumbaikars test 2000 water samples
नवी मुंबईकरांना स्वच्छ, शुद्ध पाणीपुरवठा; पाण्याच्या दोन हजार नमुन्यांच्या तपासणीतून स्पष्ट
Rajapur, leopard death, suffocation, sewage tank, Raipatan, Forest Department, postmortem, animal officer, wildlife incident, Maharashtra,
राजापूर : मांजराचा पाठलाग करताना बिबट्या सांड पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू
Kalyan, Illegal Chalis, Titwala-Balyani, Baneli Area, Kalyan Dombivli Municipality, Commissioner Indurani Jakhar
टिटवाळा बल्याणीतील बेकायदा बांधकामांवरून साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना नोटीस

हेही वाचा >>>मुंबईत मराठा समाजाचं गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत आंदोलन, मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी

या संदर्भात रहिवाशांनी अनेक वेळा महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र तक्रार केल्यानंतर अधिकारी केवळ पाहणी करून जातात. मात्र पुढे काहीच होत नाही. आजही पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे रहिवासी संतप्त झाले आहेत. चेंबूरच्या विविध भागांमध्ये महानगरपालिकेकडून २४ तास पाणीपुरवठा केला जातो, मग याच भागाला सापत्न वागणूक का देण्यात येत आहे, असा सवाल या रहिवाशांनी केला आहे. येत्या चार दिवसांत पाण्याची समस्या सोडली नाही, तर वरळी येथील जल भियंताच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिला आहे.