मुंबई : राज्य सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केला असून वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, अन्यत्र कडक निर्बंध  राहतात. शिवसेना राज्यसभा खासदाराच्या जावयाकडून चित्रपटगृहमालकांशी वाटाघाटी सुरू असल्याचा आरोप भाजप आमदार आशीष शेलार यांनी बुधवारी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळेच हॉटेल, बारमालकांशी ‘वाटाघाटी’ झाल्यावर निर्बंध शिथिल झाले. तर दुसरीकडे आर्थिक अडचणीत असलेले मराठी चित्रपट व नाट्य कलावंत, लोककलावंत, मंदिरांजवळ धूप, अगरबत्ती, फुले विकणारे व्यावसायिक आहेत. ते ‘वाटाघाटी’ करू शकत नाहीत, म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यांची उपासमार सुरू आहे. हा वाटाघाटीचा धंदा बंद करावा. आता गणेशोत्सव व नवरात्र मंडळांसोबत पण शिवसेना वाटाघाटी करणार का? असा सवाल करीत शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restrictions by the state government cinema bjp mla ashish shelar akp
First published on: 02-09-2021 at 01:13 IST