महागाईचा चढा दर व औद्योगिक उत्पादनातील मंदी याच बरोबरीने जनतेचे घटलेले बचतीचे प्रमाण याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने चिंता व्यक्त केली आहे. अर्ध-वार्षिक आíथक स्थर्य अहवालात मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी महागाईवर नियंत्रणाच्या उपायांनी अर्थविकासाचा बळी जात असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे.
वर्षांतून दोनदा प्रकाशित होणारा हा अहवाल देशाच्या वित्तीय स्थर्याच्या प्रगतीपुस्तकाचा दाखला म्हणून गृहीत धरला जातो. यात गव्हर्नरांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या आगामी प्रवासाचाही ओझरता उल्लेख केला आहे. वाढत्या महागाईचे आकडे डोक्यावर असूनही केवळ विकासाला चालना देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने यंदा व्याजदर वाढ टाळली होती.  बचतीच्या पारंपरिक साधनाऐवजी सोन्याकडे वळत असलेली गुंतवणूक अर्थव्यवस्थेवरचा ताण वाढविणारी असल्याचे बँकने म्हटले आहे. सोने आयात रोखण्यासाठी योजलेल्या उपायांमुळे सोन्याच्या आयातीत घट झाल्याचे नमूद करून यामुळे सरकारच्या चालू खात्यावरील तूट (कॅड) चालू आर्थिक वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) ३% पेक्षा कमी राहण्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

राजकीय अस्थिरता देशाच्या आíथक स्थर्याकरिता मारक : डॉ. राजन
आगामी लोकसभा निवडणुकांनंतर कुणालाही सत्ता स्थापनेस आवश्यक असलेले बहुमत न मिळाल्यास देशापुढील आíथक समस्या वाढतच जातील आणि हे देशाच्या अर्थव्यवस्थेस न परवडणारे ठरेल, असे गव्हर्नर राजन यांनी अहवालाच्या अनावरण निमित्ताने केले. आगामी निवडणुकीत जर स्थिर सरकार आले नाही तर आíथक किंवा औद्योगिक धोरणात सातत्य नसणे हे देशापुढील आíथक प्रश्न अधिक गडद होऊ शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले.