रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या २२ सप्टेंबरला उस्मानाबद येथे दुष्काळग्रस्तांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषेदत दुष्काळ निवारण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, यावर चर्चा व पक्षाचा कृती कार्यक्रम ठरविला जाणार आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिली.
राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आठवले स्वत २० व २१ सप्टेंबर असा सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, बीड या जिल्ह्यांचा दौर करणार आहेत. २२ सप्टेंबरला उस्मानबाद येथे मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर यांची परिषद होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2015 रोजी प्रकाशित
आरपीआयची मराठवाडय़ात २२ सप्टेंबरला दुष्काळी परिषद
राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Written by रोहित धामणस्कर
First published on: 17-09-2015 at 01:47 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rpi drought conference on september 22 in marathwada