मुंबई : पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. राऊत सोमवारीच विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तेव्हा विशेष न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली.

हेही वाचा : Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आजही निर्णय नाहीच; महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

हेही वाचा : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना संजय राऊतांची भेट नाकारली; तुरुंग प्रशासनाने म्हटलं, “त्यांना भेटायचं असेल तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी राऊत यांनी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. नेमक्या कोणत्या कारणास्तव राऊत यांनी जामिनाची मागणी केली आहे, याची सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही. पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राऊत यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयीने कोठडी सुनावल्याने राऊत हे सध्या आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. तसेच तेथे सध्या ते पत्राचाळ प्रकरणावर पुस्तक लिहीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.