जोगेश्वरी (पूर्व) येथील ‘अस्मिता’ संस्थेतर्फे गुरुवार, १ मे रोजी ‘शिक्षणातील नवसंकल्पना’ या विषयावर दिवसभराचे चर्चा-कृतीसत्र आयोजित करण्यात आले आहे.
नव्याने येऊ घातलेल्या ‘ज्ञानसंरचनावादा’ची ओळख, पर्यायी शिक्षणपद्धतींचा परिचय, मान्यवरांच्या मुलाखती, भाषणे, परस्परपरिचय व पुढील कृतीचा आराखडा अशी दिवसभराची भरगच्च कार्यक्रमसूची ठरविण्यात आली आहे.
या चर्चा-कृतीसत्रात ज्येष्ठ विचारवंत गिरीश प्रभुणे, रमेश पानसे, पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी शाळेचे माजी मुख्याध्यापक विवेक पोंक्षे, मिलिंद चिंधरकर, दत्तात्रय सकट तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, शिक्षक आमदार कपिल पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे या कार्यक्रमास आवर्जून उपस्थि राहणार आहेत. ‘ज्ञानसंरचनावाद’ या विषयावर घेण्यात आलेल्या लेखस्पर्धेतील विजेत्यांना या कार्यक्रमात पारितोषिके देण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमात ‘शिक्षणरुची गट’ या नावाने शिक्षक, पालक, संस्थाचालक व शिक्षण क्षेत्राविषयी आस्था असलेले अन्य क्षेत्रातील कार्यकर्ते यांच्या एका कृतिगटाची स्थापनाही करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रमाची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० अशी आहे. अस्मिता भवन, पश्चिम द्रुतगती मार्ग, जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड जंक्शन, जोगेश्वर (पूर्व) येथे हा कार्यक्रम होणार आहे. यासंदर्भात नितीन जोग यांच्याशी ९३२२५९५८८० संपर्क साधावा, असे आवाहन ‘अस्मिता’तर्फे करण्यात येणार आहे.