स्वर्गीय आनंद दिघेंनी गद्दारी झाल्यानंतर ठाण्यात काय केलं होतं हे आठवतं का? अशी आठवण शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला करुन दिली आहे. उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख ठरले. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात दंगली झाल्या नाहीत याचीच भाजपाला सल आहे असा आरोपही त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी केला. आपण बाळासाहेबांचे खंदे समर्थक आहोत असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंना देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही त्यांनी टीका केली.

एकनाथ शिंदे यांनी आपण बाळासाहेबांचे खंदे समर्थक असल्याचं म्हटलं आहे असं सांगितलं असता अरविंद सावंत म्हणाले “तुमच्यावरील ईडी, सीबीआयच्या केसेस, खुनाचा आरोप याचं काय झालं ते त्यांनी आधी सांगावं आणि नंतर आपण बाळासाहेबांचे समर्थक आहोत म्हणावं. ज्या आनंद दिघेंचं ते नाव घेतात त्यांनी ठाण्यात गद्दारी झाल्यानंतर काय केलं होतं आठवतं का? त्यांनी सर्व नगरसेवकांचे राजीनामे घेतले होते. पाच वर्ष ठाण्यात विरोधी पक्षच नव्हता. एकाने गुन्हा केला म्हणून सर्वांना शिक्षा दिली होते, आज आनंद दिघे असते तर यांच काय झालं असतं विचार करा”.

Jaya bhaduri father said my family is ruined
“माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय”, अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यावर जया यांच्या वडिलांनी व्याहींजवळ व्यक्त केलेल्या भावना
A letter from the people of Nagpur on the occasion of Devendra Fadnavis birthday nagpur
“उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपण नागपूरकरांना वाळीतच टाकले…” देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या ‘त्या’ पत्राची सर्वत्र चर्चा
Sunil Shelke, Supriya Sule, Baramati,
“आम्ही कधी बारामती बारामती म्हटले का?”, आमदार सुनील शेळके आणि सुप्रिया सुळे यांच्यात वाद
arvind kejriwal low calorie diet allegation by delhi lg
Arvind Kejriwal : “अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक…”, तुरुंगातील आहारावरून नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांचा गंभीर आरोप!
शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आनंदच, पण..; सुनील शेळके नेमकं असं का म्हणाले?
Narendra Modi In Radhika- Anant Ambani Wedding
नरेंद्र मोदी यांनी नीता अंबानींना वाकून केला नमस्कार? फोटो पाहून लोक म्हणतात, “मालकिणीसमोर तर..”, वाचा खरं काय
sena ubt leader kirtikar moves bombay hc seeks to declare waikar s victory void
वायकर यांच्या खासदारकीला अमोल कीर्तीकरांचे आव्हान
What Kiran Mane Said in his Post?
किरण माने यांची पोस्ट चर्चेत, “ब्राह्मण्यवादी व्यवस्थेनं बहुजनांना ‘पाप पुण्या’ची भीती दाखवून…”

‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या, पण महाराष्ट्रात झाल्या नाहीत. भाजपाला याचीच सल आहे. त्यामुळे त्यांनी मतांचं ध्रुवीकण सुरु केलं असून महाराष्ट्र हे न कळण्याइतका खुळा नाही. उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख ठरले. महाराष्ट्र कसा एकजूट ठेवावा, सर्व धर्मांचा आदर कसा करावा, सगळ्यांच्या भावना कशा जपाव्यात, महाराष्ट्र पुढे कसा न्यावा हे उद्दव ठाकरेंनी दाखवून दिलं,” असंही ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ

“न्यायालयीन व्यवस्था अजून निर्णय घेत नाही, पोलीसदेखील एकाच बाजूने वागत आहेत. कायदा सुव्यवस्थेची काळजी असेल तर कालपर्यंत ज्यांनी हात पाय तोडेन अशा वल्गना केल्या त्यांच्यावर काय कारवाया केल्या याचं उत्तरही दिलं पाहिजे. त्यासाठीच आम्ही राज्यपालांना भेटलो होतो. राज्य कुठे चाललं आहे? गृहमंत्र्याचं आदेशावरुनच हे सर्व सुरु आहे. म्हणूनच दिल्लीतही हातात कागद घेऊन बोलावं लागतं,” अशी टीकाही अरविंद सावंत यांनी केली.