मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या भाजपाच्या पोलखोल अभियानाचा शेवट रविवारी मुंबईतील सोमय्या मैदावर झाला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धवजी ईद हा राष्ट्रीय सण कधीपासून झाला? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“या सभेला बुस्टर डोस म्हणण्यात आलं आहे. या डोसचा मुंबईकरांसाठी अर्थ इशारा देणे आहे. ही सभा त्या अर्थाने महाविकास आघाडीसाठी डोस आहे. आता भाजपा जुनी राहिलेली नाही. तुम्ही मात्र जुनेच आहात. दुसरा डोस हा कार्यकर्त्यांसाठी आणि नागरिकांसाठी आहे. मी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारणार आहे. तुम्ही रोज उठून मी हिंदुत्वावादी असे म्हणत आहात. माहितीच्या अधिकारात माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी सरकारला एक पत्र लिहिले होते. त्यात उत्तरात ईद या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने पगार लवकर देण्यात आल्याचे सांगितले. उद्धवजी ईद हा राष्ट्रीय सण कधीपासून झाला? या प्रश्नाचे उत्तर द्या,” असा सवाल चंद्रकांत पाटील विचारला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Since when is eid a national holiday chandrakant patil question to cm uddhav thackeray abn
First published on: 01-05-2022 at 22:53 IST