पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गेल्या तेरा वर्षांत हजारो कोटी रुपये खर्च झाल्यावर आता शहरात पाणी भरण्याची नवी ठिकाणे उदयास आली आहेत. त्यामुळे २६ जुलैनंतर तेवढा पाऊस आणि पुराचा हाहाकार झाला नसला तरी त्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यानच्या काळात तंत्रज्ञानामुळे आपत्कालीन स्थितीतील नियोजन आणि हवामानाच्या अंदाजात मात्र सकारात्मक बदल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चौदा वर्षांपूर्वी म्हणजेच २६ जुलै २००५ रोजी सांताक्रूझ येथे पडलेल्या तब्बल ९४४ मिमी पावसाने शहरात हाहाकार माजला होता. या पावसाने शहर तीन दिवस बंद होते. मुंबई परिसरात सुमारे १ हजार ९४ लोकांचा मृत्यू झाला आणि अब्जावधी रुपयांच्या सामानाचे नुकसान झाले. त्यानंतर पालिका प्रशासनाने ९० च्या दशकात करून घेतलेला ब्रिमस्टोवॅड अहवाल अंमलबजावणीसाठी बाहेर काढला. दर तासाला ५० मिलिमीटर पाऊस पडला तर पाण्याचा निचरा करण्यासाठी या अहवालात सुचवण्यात आलेल्या ८० टक्के शिफारशी पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी या पावसाळ्यात जुलैच्या पहिल्या आठवडय़ात पडलेल्या पावसात पाणी भरण्याची नवीन ठिकाणे उदयाला आल्याचे आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समितीत स्पष्ट केले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Situation remains same even after 14 years of mumbai floods 26 july 2005 scsg
First published on: 26-07-2019 at 10:58 IST