राज्यात सध्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम सुरू असतानाच, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या बदल्यांच्या अधिकारांना कात्री लावण्यात आली आहे. मंत्र्यांकडील बदल्यांचे बहुतांश अधिकार विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले आहेत. तसा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्न व नागरी पुरवठा विभागात ५० टक्के अधिकारी व कर्मचारी महसूल विभागातील असतात. त्यांच्या बदल्यांचे, बढत्यांचे अधिकार महसूल विभागाला असतात. उर्वरित स्वत:च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार अन्न व नागरी पुरवठा विभागाला आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transfers rights scissors of food and civil supplies minister
First published on: 01-06-2016 at 03:22 IST