लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे. मात्र मागील अनेक महिन्यांपासून क्षयरुग्णांना औषधेच मिळालेली नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांच्या घोषणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबईसह राज्यामध्ये एमडीआर क्षयरोग रुग्णांना जूनपासून औषधेच मिळालेली नाहीत. सरकारी रुग्णालयांमध्ये औषधेचे उपलब्ध नसतील, तर देश क्षयरोगमुक्त कसा होईल, असा प्रश्न उपस्थित करणारी पत्रे रुग्णांनी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांना पाठविली आहेत.

pm Narendra modi, health sector
आरोग्यावर अडीच टक्के तरतुदीची पंतप्रधान मोदींची २०१७ ची घोषणा हवेतच! आरोग्यावरील तरतूद निराशाजनक…
Shoot at sight orders in Bangladesh supreme court jobs quota
आंदोलकांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश; बांगलादेशमधील परिस्थिती चिघळली, १२३ जणांचा मृत्यू
‘योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार नको!’ लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
‘योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार नको!’ लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
mumbai high court marathi news
११ वर्षे प्रलंबित खड्ड्यांशी संबंधित प्रकरणाला पूर्णविराम मिळणार; समस्येसाठी यंत्रणांचा निष्काळजपणा जबाबदारच, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Committee, Flamingo, Habitat,
फ्लेमिंगो अधिवास, कांदळवन संरक्षणासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; समितीला दोन महिन्यांच्या आत अहवाल देण्याचे आदेश
Citizen Protests in Israel Calls for Prime Minister Netanyahu to step down
इस्रायलमध्ये नागरिकांची निदर्शने; पंतप्रधान नेतान्याहू यांना पायउतार होण्याचे आवाहन
People Response to Prime Minister Solar Energy Scheme print politics news
पंतप्रधान सौरऊर्जा योजनेस भरभरून प्रतिसाद, मात्र अंमलबजावणीत मंदगती, केंद्रराज्य यंत्रणेत समन्वयाचा अभाव
mhada houses scam distribution of mhada houses to the winners before the inquiry report submitted
म्हाडा घरांच्या सोडतीत गैरप्रकार, चौकशी अहवाल सादर होण्यापूर्वीच विजेत्यांना घरे वितरणाचा घाट?

आणखी वाचा-उंचीवर मर्यादा घालण्यास सरकार अनुत्सुक; दहिहंडीच्या सुरक्षा उपाययोजनांबाबत न्यायालयाने निर्णय देऊनही चालढकल

राज्यातील सरकारी रुग्णालयांसह विविध आरोग्य केंद्रांवर मागील तीन महिन्यांपासून क्षयरोगावरील औषधेच उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे मुंबई विभागातील जवळपास ११ हजार एमडीआर क्षयरोग रुग्णांना याचा फटका बसत आहे. आरोग्य केंद्रांवर औषधे मिळत नसल्याने रुग्णांना खासगी औषधांच्या दुकानातून औषधे खरेदी करावी लागत आहेत. एमडीआर क्षयरोग असलेल्या रुग्णांना पाच औषधे दिली जातात. त्यापैकी सायक्लोसिरिन लाईनजोलिड, क्लोफाजिमाईन या औषधांचा साठाच उपलब्ध नाही. त्यामुळे ही औषधे रुग्णांना बाहेरून विकत घ्यावी लागत असल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ही औषधे कधी मिळतील याबाबत मुंबई क्षयरोग नियंत्रण विभागाकडे विचारणा करण्यात आल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. औषधांअभावी क्षयरोग रुग्णांना होणाऱ्या या त्रासाची माहिती देण्यासाठी क्षयरुग्णांसाठी काम करणाऱ्या समाजसेवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांना पत्र पाठविली आहेत. औषधे का उपलब्ध होत नाहीत, असी विचारणाही या पत्रात करण्यात आली आहे.