तुर्भे येथील सावन नॉलेज पार्क या कंपनीच्या भिंतीचे साफसफाईचे काम सुरू असताना शनिवारी सकाळी विजेचा धक्का लागून दोन कामगार मृत्युमुखी पडले. अनिरुद्ध सिंह आणि लालजी यादव अशी या कामगारांची नावे आहेत.
शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सिंह आणि यादव लोखंडी ट्रॉलीच्या साहाय्याने साफसफाईचे काम करीत होते. तेव्हा ही ट्रॉली उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला चिकटली आणि दोन कामगारांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामध्ये ते दोघे जागीच ठार झाले. या प्रकरणी कंपनीविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two died due to electric shock in mumbai
First published on: 06-04-2014 at 01:12 IST