राज्यात एखाद्या गुन्ह्यामध्ये बळी पडलेल्या व्यक्तीस किंवा त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यासाठी ‘व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन’ योजना लागू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यात एखाद्या गुन्ह्यांमध्ये जीवितहानी झाल्यास या योजनेंतर्गत जिल्हा किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणामार्फत त्या व्यक्तीच्या वारसांना कमाल दोन लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीस कमाल ५० हजार रुपये आणि ऍसिड हल्ला झाल्यास त्या व्यक्तीस तीन लाख रुपये एवढी नुकसान भरपाई देण्यात येईल. याशिवाय बळी पडलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी दोन हजार रुपये आणि तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी झालेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी १५ हजार रुपयांपर्यत मदत देण्यात येणार आहे. या योजनेचे नियंत्रण गृह विभाग करणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2014 रोजी प्रकाशित
गुन्ह्यांतील पीडितांसाठी व्हिक्टिम कॉम्पन्सेशन योजना लागू
राज्यात एखाद्या गुन्ह्यामध्ये बळी पडलेल्या व्यक्तीस किंवा त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यासाठी 'व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन' योजना लागू करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
First published on: 15-01-2014 at 04:53 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Victim compensation scheme implemented in maharashtra