राज्यातील जनतेची एकसंघपणाची भावना हेच महाराष्ट्राचे बलस्थान आहे. पुढील काळात राज्याचे अग्रस्थान कायम ठेवण्यासाठी कोरडवाहू शेती शाश्वत करणे, राज्याला पाणीटंचाई मुक्त करणे, राज्याचा संतुलित औद्योगिक विकास करणे, सुनियोजित नागरीकरण करणे आणि शिक्षणाचा दर्जा वाढविणे या पंचसूत्रीवर भर दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केली.
मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन केल्यावर राज्यातील जनतेला संबोधित करताना चव्हाण यांनी स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे हुतात्मे आणि असंख्य स्वातंत्र्यसैनि
ते म्हणाले, यावर्षीच्या स्वातंत्र्यदिना
कायद्याने आणि नियमांनी आखून दिलेल्या चाकोरीतून देशाचा किंवा एखाद्या राज्याचा गाडा चालतो. मात्र याहीपेक्षा सर्वात महत्वाची ऊर्जा असते ती म्हणजे राष्ट्रप्रेमाची भावना. आपण सर्व एकसंघ आहोत, राज्य आणि प्रदेश वेगवेगळे असले तरी देशाच्या प्रती आपले कर्तव्य आहे ही भावना महत्वाची आहे, असे चव्हाण म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Aug 2013 रोजी प्रकाशित
राज्याला पाणीटंचाई मुक्त करू – मुख्यमंत्री
राज्यातील जनतेची एकसंघपणाची भावना हेच महाराष्ट्राचे बलस्थान आहे. पुढील काळात राज्याचे अग्रस्थान कायम ठेवण्यासाठी कोरडवाहू शेती शाश्वत करणे, राज्याला पाणीटंचाई मुक्त करणे
First published on: 15-08-2013 at 05:31 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will change maharashtra into drought free state says prithviraj chavan