मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचं थकीत कर्ज माफ करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मार्च २०२० पासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सर्व रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. तसंच यासाठी कोणत्याही अटीशर्थी ठेवण्यात आल्या नसल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा केव्हा कोरा करणार असा सवाल केला. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. यावर बोलताना काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी विदर्भाच्या सुपुत्राने वॉकआऊट केला पण नातवाने न्याय दिला, असं वक्तव्य केलं. सुरूवातीला बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना मी विदर्भाचा नातू आहे. आजोळचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्वाचे आहेत, असं म्हटलं होतं.

शेतकरी कर्जमाफीसंदर्भात एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसंच मार्च महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे. सर्वांचे डोळे लागून राहिले होते, अशी कर्जमाफीची घोषणा आज करण्यात आली. यासाठी कोणत्याही अटी-शर्थी ठेवण्यात आलेल्या नाहीत. आम्ही जे वचन दिलं ते पूर्ण केलं. ही केवळ सुरूवात आहे. आम्ही जेवढी वचनं दिली ती सर्व पूर्ण करणार आहोत, असं प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक आदर आहे. ते सभागृहातही सर्वांशी हात जोडून बोलत होते. त्यांनी सभागृहात काही गोष्टींवरून विरोधकांची माफीही मागितली. एवढीच इतरांप्रती आदराची भावना जर विरोधकांमध्ये असती तर आज कदाचित आम्ही विरोधकांच्या जागी बसलो असतो असंही त्या म्हणाल्या.

plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचं थकीत कर्ज माफ करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मार्च २०२० पासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सर्व रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. तसंच यासाठी कोणत्याही अटीशर्थी ठेवण्यात आल्या नसल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. यानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांचा सातबारा केव्हा कोरा करणार असं विचारत सभात्याग केला.