scorecardresearch

Premium

“मुंबईची तुंबई म्हणून बदनामी, नागपूरचा पूर राजकीय अपयश”, अंबादास दानवेंचे विधान, म्हणतात..

केंद्र व राज्यातील मोठे नेतृत्व असूनही केवळ १०० ते १२५ मिलीमीटर पावसात नागपूर पुरात बुडते हे राजकीय अपयश आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

Ambadas Danve reaction flood Nagpur
"मुंबईची तुंबई म्हणून बदनामी, नागपूरचा पूर राजकीय अपयश", अंबादास दानवेंचे विधान, म्हणतात.. (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

नागपूर : मुंबईत पावसाचे पाणी साचले तर मुंबईची तुंबई झाली म्हणून भाजपाने बदनामी केली. परंतु नागपुराच्या विकासाचा सोंग करून येथे सिमेंटचे जंगल केले. येथे केंद्र व राज्यातील मोठे नेतृत्व असूनही केवळ १०० ते १२५ मिलीमीटर पावसात नागपूर पुरात बुडते हे राजकीय अपयश आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

नागपुरातील अंबाझरीसह पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यावर दानवे यांनी रविभवन येथे पत्रपरिषद घेतली. त्यात ते बोलत होते. दानवे म्हणाले, आपल्या मर्जीतील गुत्तेदारांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचे सोंग घेऊन सिमेंटीकीकरण व पर्यावरणाचा ऱ्हास करून नागपूरकरांना पूरपरिस्थितीत ढकलून देण्याचे पाप हे स्थानिक राजकीय नेतृत्वाने केले. या घटनेला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे नेतृत्व असलेले देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे.

guardian ministers, vidarbh guardian ministers appointment, four disticts of vidarbh, guardian minister outside vidarbh
विदर्भातील चार जिल्ह्यांचे पालकत्व विदर्भाबाहेरील मंत्र्यांकडे
Five guardian ministers Gondia district
गोंदिया जिल्ह्यात चार वर्षांत पाच पालकमंत्री!
nitin gadkari criticize central government, nitin gadkari says low facilities in villages
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर, ‘महात्मा गांधी म्हणत गावाकडे चला अन् आता…’
hunger strike against Jarange Patil
चंद्रपूर : जरांगे पाटलांच्या मागणीविरोधात अन्नत्याग आंदोलन, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाच्या जिल्हाध्यक्षाचे उपोषण सुरू

हेही वाचा – चंद्रपूर जिल्हा ‘गॅझेटिअर’मधून महत्त्वाच्या नोंदी वगळल्या

नागपुरात महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासमध्ये समन्वय नसून या पूर स्थितीला तेही जबाबदार आहेत. नागपुरात प्रशासन ही घटना घडण्याची वाट बघत होते का अशी स्थिती आहे. महापालिकेने नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले असले तरी अद्याप नागरिकांपर्यंत मदत पोहोचणे आवश्यक आहे. अंबाझरी तलावाची संरक्षक भिंत तुटल्याने ही दुर्दैवी घटना घडली. मात्र या भिंतीचे काम हे चार टप्प्यात होणार होते, पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या टप्प्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले, असा आरोप दानवे यांनी केला.

सध्या पुरामुळे पहिल्या टप्प्याचे काम नव्याने करावे लागेल अशी स्थिती आहे. या संरक्षक भिंतीच्या चारही टप्प्यांच्या कामाचा नव्याने विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनवून काम लवकरात लवकर हाती घ्यावे, या कामात आमचे सहकार्य राहील अशा सूचना जिल्हाधिकारींना केली. प्रशासन यंत्रणेवर नसलेले नियंत्रण, अतिविश्वास व विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांमुळे नागपूरकरांना पुराला सामोरे जावे लागत असेल तर हे दुर्दैव असल्याची टीका दानवे यांनी केली.

हेही वाचा – “सत्तेसाठी खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी राज्यात पेपरफुटी”, विजय वडेट्टीवार यांचा आरोप; म्हणाले…

यावेळी संपर्क प्रमुख व आमदार दुष्यंत चतुर्वेदी, माजी खासदार प्रकाश जाधव, सुरेखा खोब्रागडे जिल्हा संघटिका, शिल्पा बोडखे पूर्व विदर्भ महिला संघटिका, माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे व पदाधिकारी उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ambadas danve reaction to the flood situation in nagpur criticized bjp mnb 82 ssb

First published on: 26-09-2023 at 15:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×