स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपा आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तसेच या दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांनी अटक करण्याची मागणीही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

हेही वाचा- नागपूर : उपराजधानीतून आणखी दोन बाळांची विक्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार कृष्णा खोपडे आणि आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात शुक्रवारी भाजपा कार्यकर्त्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्या विरोधात सावरकर सारख्या महापुरुषाचा अपमान होईल आणि समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. पुढील सात दिवसात जर पोलिसांनी या संदर्भात कारवाई केली नाही. तर आम्ही राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी न्यायालयाचे दार ठोठावू असा इशाराही भाजपने यावेळी दिला. यावेळी अर्चना डेहनकर. शिवानी दाणी. धर्मपाल मेश्राम.चंदन गोस्वामी आदी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.