समृद्धी महामार्गावर अपघात थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता नागपूरहून पुण्यााला निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीच्या एसी स्लीपर कोच बसचा बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, आठ प्रवाशांचा जीव वाचला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा परिसरात हा अपघात झाला आहे. बसमध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. यातील २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर, चालक, क्लिनरसह आठ जण बसच्या खिडकीच्या काचा फोडून बाहेर पडण्यात यशस्वी झाले आहेत. अपघाताबद्दल प्रत्यक्षदर्शीने थरारक प्रसंग सांगितला आहे.

buldhana tin roof death marathi news
बुलढाण्यात वादळाचे तांडव; घरावरील टिनपत्रासह पाळणा उडाला, चिमुकलीचा करुण अंत
kolhapur, Heavy Rainfall, Heavy Rainfall in Kolhapur District, Heavy Rainfall Affected kagal tehsil , heavy Rainfall news, Kolhapur news,
कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; ओढ्यांना पूर
3 dead including husband and wife and five injured in an accident on samruddhi expressway
‘समृद्धी’वर अपघातात पती-पत्नीसह तिघांचा मृत्यू; पाच जखमी
Mumbai Nagpur Samruddhi Highway, Contractor Negligence, Fatal Accident in thane, Contractor Negligence Leads to Fatal Accident,
समृद्धी महामार्गाच्या आणखी एका मजूराचा निष्काळजीमुळे मृत्यू, नवयुगा कंपनीच्या कर्मचाऱ्यासह मजूर ठेकेदार अटकेत
The incident of killing of wife due to domestic dispute at Betkathi on Chhattisgarh border in Korchi taluka of the district
 पत्नीची हत्या करून रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन गावभर फिरला पती…..
Nashik, pwd Plans 137 Km Outer Ring Road in nashik, Simhastha Kumbh Mela, public works department, Ease Traffic Congestion,
नाशिक : सिंहस्थासाठी १३७ किलोमीटरच्या बाह्य वळण रस्त्याचा प्रस्ताव, दोन हजार कोटींचा खर्च अपेक्षित
Lightning strikes a moving st mahamandal bus
भयंकर…धावत्या बसवर वीज कोसळली, महिला वाहक…..
Sensational Double Murder, Double Murder in phaltan taluka, Brother and Sister murder, crime news, phaltan news,
पारधी समाजातील तरुण सख्ख्या बहिण-भावाचा खून

हेही वाचा : लोकजागर : मृत्यूचा ‘समृद्ध’ महामार्ग!

प्रत्यक्षदर्शी वकील संदीप म्हेत्रे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हटलं की, “आम्ही अपघाताच्या ठिकाणी पोहचल्यानंतर पाहिलं, तर भयंकर परिस्थिती होती. आमच्या डोळ्याने लोक होरपळताना पाहत होतो. गाडीने मोठा पेट घेतला होता. गाडीचे दोन टायर बाजूला पडले होते. अपघात झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले की, कोणीतरी थांबेल आणि मदत करेल. मात्र, भावनाशून्य लोक या जगात आहेत. त्यातील कोणीही याठिकाणी थांबले नाहीत.”

“बसमध्ये एक महिला आणि लहान मुलगा होता. अपघातानंतर त्यांना बसच्या मागील बाजूने बाहेर काढण्यात आलं. पण, ते लहान मुल पूर्ण होरपळलेलं पाहून अंगावर शहारे आले. काच फोडण्यासाठी काही मिळालं असते, तर ते लोक वाचले असते,” असं म्हेत्रे यांनी म्हटलं.

हेही वाचा : विश्लेषण : समृद्धी महामार्गावरील अपघात कसे रोखणार?

“अपघात झाल्यानंतर काहीजण बसच्या मागील बाजूला गेले, तर काहीजण समोर आले. ते आतून काचेला जोरात मारत होते. पण, काच न फुटल्याने सर्वजण जागीच होरपळून मृत्यू झाला आहे,” असा दावा दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने केला आहे.