नागपूर : भारतात चित्त्याच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली असून मे २०२२ पर्यंत तो येण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात मध्यप्रदेशातील कुनो येथे तीन ते पाच चित्ते येणार असून १५ ऑगस्टपर्यंत त्यांना जंगलात सोडले जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात चित्ता आणण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची चमू सुमारे महिनाभरापूर्वी नामिबिया येथे गेली होती. यात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयातील अधिकारी तसेच राज्याचे प्रधान सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी भारतात पाठवल्या जाणाऱ्या चित्त्यांची पाहणी करून त्यांच्या स्थलांतरण व्यवस्थेचा आढावा घेतला. नामिबियाने सामंजस्य कराराचा मसुदा तयार केला. भारताने वन्यजीवांच्या शाश्वत उपयोगासाठी नामिबियाला पािठबा द्यावा, अशी एक अट या करारात असल्याचे कळते. या सामंजस्य कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी सध्या बोलणी सुरू आहे. मार्चअखेर या कराराला अंतिम स्वरूप मिळेल आणि त्यावर स्वाक्षरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नामिबिया सरकारद्वारे नाही तर चित्ता संवर्धन निधी या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने भारताला चित्ते देण्यात येणार आहेत. भारतात नोव्हेंबर महिन्यातच चित्ता येणार होता. त्यासाठी तयारी देखील झाली होती, पण करोनामुळे त्याचे आगमन लांबले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheetahs arrive india namibia mayplan bring leopards five years amy
First published on: 25-03-2022 at 03:28 IST