अमरावती: तिवसा येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षीय सराफा व्यावसायिकाच्या घरात शिरून हत्‍या करण्‍यात आली. त्यानंतर मारेकऱ्यांनी त्याच्या घरातील सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना सोमवारी रात्री उघड झाली.

संजय भगवंतराव मंडळे (५५, रा. तिवसा) असे मृताचे नाव आहे. मंडळे हे सराफा व्यावसायिक असून तिवसा शहरातच त्यांचे दुकान आहे. दरम्यान सोमवारी दुपारी मंडळे यांचा मुलगा व पत्नी हे दोघे रुग्णालयात काम असल्यामुळे अमरावतीत आले होते. तसेच काही महिन्यांपूर्वी संजय मंडळे यांचा अपघात झाला होता, त्यामुळे सध्या ते घरीच राहत होते.

thane schools holiday marathi news
ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी
rti activist vijay kumbhar demands inquiry against ycm doctors for giving disability certificate to ias pooja khedkar
IAS पूजा खेडकर प्रकरण: पिंपरीच्या वायसीएममधील डॉक्टरांची चौकशी करावी- आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी
Students drowned in mud wardh
चिखलात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू, जबाबदार कोण?
female doctor suicide
डॉक्टर महिलेची विष प्राशन करून आत्महत्या
senior citizen chaturang
सांधा बदलताना : निवृत्तीचा काळ सुखाचा…
Girl, stabbed, scissor, one sided love,
वर्धा : एकतर्फी प्रेमातून युवतीवर कैचीने वार, माथेफिरू युवक…
Shivajinagar, teacher, Umarkhed taluka,
यवतमाळ : नोकरीचा तिसराच दिवस अन काळाने साधला डाव…
cyclists Foundation organized 350 km cycle ride from Nashik to Pandharpur from July 5 to 7 on occasion of ashadhi ekadashi
पंढरपूरमध्ये राज्यभरातील सायकलपटूंचा रिंगण सोहळा; नाशिक-पंढरपूर सायकलवारीत ३०० जणांचा सहभाग

हेही वाचा… दिवसा रेकी, रात्री चोरी! यवतमाळ जिल्ह्यात दीड हजारांवर चोरी, घरफोडीचे गुन्हे

सोमवारी रात्री मंडळे यांचा मुलगा व पत्नी अमरावतीतून घरी पोहोचले तर त्यांना धक्काच बसला. घराचा दरवाजा उघडा होता आणि संजय मंडळे रक्ताच्या थारोळ्यात हॉलमध्ये पडून होते. तत्‍काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्‍यात आली. पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठले.
मंडळे यांची दागिने ठेवलेली बॅग त्यांच्या कुटुंबीयांनी पाहिली असता, ती कुठेही दिसून आली नाही. त्यामुळे मारेकऱ्यांनीच ती पळवल्याचा अंदाज व्यक्त करून सोने लुटण्यासाठीच ही हत्‍या झाल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामीण पोलिसांनी वर्तवला आहे. बॅगमध्ये नेमके किती सोने होते, मारेकऱ्यांनी लूट करण्यासाठीच खून केला की अन्य काही कारण आहे, याबाबत पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.