नागपूर: घरात दिवाळी सणाची तयारी सुरु असतानाच पतीसह सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी सुनेचा अतोनात छळ केला. शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून सूनेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रितू राहुल पटले (२६, रा.ओमनगर, कोराडी) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

राहुल पटले हा भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. गेल्या १० मे रोजी राहुलचे मध्यप्रदेशातील बालाघाट शहरातील सेवकराम टेंभरे यांची मुलगी रितूशी लग्न झाले होते. लग्नात हुंडा न दिल्यामुळे आणि पाहुण्यांचा पाहुणचार व्यवस्थित न केल्यामुळे नवविवाहित रितूला लग्नाच्या पहिल्याच दिवशी पती राहुलने मारहाण केली होती. तसेच तिच्या वडिलाचा अपमान करीत शिवीगाळ केली होती. लग्न झाल्यानंतर सुखी संसाराची स्वप्ने रंगविणाऱ्या रितूला रोज माहेरून हुंडा आणण्यासाठी त्रास देणे सुरु होते.

plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

हेही वाचा… अमरावती : तिकिटांचा काळाबाजार; ७७ जणांना अटक

सासू रेखा राजेश पटले (५५) आणि दोन्ही ननंद राणी रहांगडाले आणि मिनू या तिघीही रितूला मारहाण करीत होत्या. तिला घरात कोंडून ठेवण्यात येत होते. वडिल गरीब असल्यामुळे रितूने गेल्या पाच महिन्यांपासून कोणतीही तक्रार न करता संसार केला. मात्र, दिवाळीत माहेरून सोन्याचे दागिने आणण्यासाठी तिला मारहाण करण्यात आली. दागिने न आणल्यास घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली.

ऐन दिवाळीत आई-वडिलांच्या घरी परत जाण्याऐवजी रितूने आत्महत्या करून जीवन संपविण्याचा पर्याय स्विकारला. रितूने ११ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी रितूचे वडिलाच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी पती, सासू, दोन ननंद यांच्यावर आत्मत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.