नागपूर : उपराजधानी गेल्याच आठवड्यात तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहचले असताना आज मात्र अचानक वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने उपराजधानीला झोडपले. ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि अवघ्या तासाभरातच उपराजधानी ओलिचिंब झाली. हा पाऊस दुपारपर्यंत कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

हेही वाचा >>> भंडारा : बडा बाजार येथील बिसेन हॉटेलला भीषण आग

imd predicted temperature will remain high in mumbai for the next two days
उकाडा, घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण; दिवसा ऊन, संध्याकाळच्या पावसामुळे आर्द्रतेतही वाढ
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
rain Mumbai , Mumbai rain news, Mumbai latest news,
मुंबईत पुढील तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
Builders have an upbeat picture of rising home sales in the near future
पुण्या-मुंबईत घरांच्या खरेदीसाठी अच्छे दिन? बांधकाम क्षेत्र काय म्हणतंय जाणून घ्या…
child died in a collision with a municipal garbage truck in Govandi Mumbai news
गोवंडीमध्ये महापालिकेच्या कचरावाहू ट्रकच्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू
Heavy rain in Nagpur, rain Nagpur, weather Nagpur,
नागपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी
Meteorological department predicted rain in Mumbai
मुंबईत रविवारी हलक्या सरींचा अंदाज
There has increase in number of potholes in Dronagiri node of Uran during monsoon
द्रोणागिरी परिसर खड्ड्यांत; पाऊस थांबल्याने मार्गावरील धुळीच्या उधळणीने प्रवासी आणि नागरिक त्रस्त

मागील आठवडा पूर्णपणे उष्णतेच्या लाटेत गेल्यानंतर या आठवड्याची सुरुवात मात्र अवकाळी पावसाने झाली. मंगळवारी दुपारच्या सुमारास देखील शहरात गारपिटीसह पाऊस झाला. सोबतच वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या, झाडे उन्मळून पडली. तर आज मात्र सकाळपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली आणि नऊ वाजताच्या सुमारास शहर पूर्णपणे काळवंडले. त्यानंतर ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्यांचा वेगही अधिक होता.

हेही वाचा >>> नागपूर विभागातील अवयव प्रत्यारोपणाची विक्रमाकडे वाटचाल

वादळीवाऱ्यांसह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे तासाभरातच संपूर्ण शहर जलमय झाले. हा पाऊस दुपारपर्यंत कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान हवामान खात्याकडून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता.  खात्याच्या अंदाजानुसार या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास ३० ते ४० किलोमीटर इतका राहणार आहे. राज्यात हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.