शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांना आजी माजी नेत्यांनी घेरले. तेव्हा काही खास वगळता कोणीही त्यांच्या बाजूने जोरकस बाजू मांडत नसल्याचे चित्र राज्याने पाहले. पक्ष विरहित समाजकारण करणारे तर दूरच.या पार्श्वभूमीवर सदैव आंदोलनाच्या भूमिकेत राहणाऱ्या युवा परिवर्तन या स्वयंसेवी संघटनेने ठाकरे समर्थनार्थ यात्राच काढली आहे.

हेही वाचा >>>वर्धा: शेतीच्या आर्थिक वर्षास ‘सांजोनी’ ने आरंभ, जाणून घ्या लुप्त होत चाललेल्या या प्रथेबाबत

smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
PM Thailand, Paetongtarn Shinawatra,
विश्लेषण : थायलंडच्या पंतप्रधानपदी ३७ वर्षीय युवा महिला… कोण आहेत पेतोंगतार्न शिनावात्रा? त्यांच्यासमोर कोणती आव्हाने?
Tension in Koregaon Constituency due to banner tearing
फलक फाडल्यावरून कोरेगाव मतदार संघात तणाव, दोन्ही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare
“…तर १५०० परत घेऊ”, रवी राणांच्या विधानावर आदिती तटकरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “महायुतीच्या सरकारने…”
Sanjay Raut on Mahavikas Aghadi
Sanjay Raut : “उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला करणारे दिल्लीच्या अब्दालीचे लोक”, संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “मर्द असाल तर…”
cm eknath shinde reaction uddhav thackeray convoy attack
Eknath Shinde : “अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन…”; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया!

येथील ‘युवा परिवर्तन की आवाज’ या संघटनेने शिवाजी चौकातून यात्रेचा जागर केला. २२ मार्चला रामटेक येथील राम मंदीरातून यात्रा सुरू झाली असून ३० मार्चला मुंबईत मातोश्री येथे यात्रेचा समारोप होणार आहे. रामटेक, यवतमाळ, अमरावती ते मालेगाव, नाशिक, भिवंडी असा मार्ग राहणार असून मुंबईत यात्रा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापासून ते मातोश्री निवासस्थानापर्यंत पायदळ राहणार आहे.

हेही वाचा >>>चंद्रपूर जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी

संघटनेचे निहाल पांडे म्हणाले की यात्रेचे नाव महाभारत यात्रा आहे. महाभारतात ज्याप्रमाणे कौरवांनी धोका देत पांडवांचे राज्य हस्तगत केले होते त्याचप्रमाणे शिंदे-फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना धोका दिला. केंद्राच्या सत्तेचा धाक दाखवत ठाकरेंना वनवास दाखविला. उध्दव ठाकरे हे एकनिष्ठ लोकांच्या ताकदीवर खंबीरपणे उभे आहे. एखाद्या व्यक्तीचे घर सरकारने पाडले तर सर्वसमाज त्या व्यक्तीच्या पाठीशी उभा राहतो. सरकार विरोधात आंदोलन करतो. लाखो शिवसैनिक शिवसेनेला आपले घर मानत होते. हे घर उध्दव ठाकरे यांना परत मिळवून देण्यासाठी ही यात्रा असल्याचे निहाल पांडे म्हणाले.

यावेळी शिंदे-फडणवीस यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. यात्रेत मोठ्याप्रमाणात महिला व युवक सहभागी झाले आहे.