लोकसत्ता टीम

नागपूर : रेल्वे स्थानक, धावत्या गाडीतून चोरी गेलेल्या, हरवलेल्या वस्तू परत मिळणे जवळजवळ अश्यकच असते, परंतु रेल्वे सुरक्षा दलाने मनावर घेतले आणि योग्य दिशेने तपास केल्यास चोरी गेलेल्या वस्तू मिळवल्या जाऊ शकतात, असाच काही अनुभव मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आला. एप्रिल महिन्यात आरपीएफने सात लाखांहून अधिक किंमतीच्या वस्तू प्रवाशांना परत मिळवून दिल्या आहेत.

Radhika Khera congress
“रात्री नशेत असताना ते…”, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप करत राधिका खेरांचा राजीनामा
driver fell asleep while drive on Samriddhi highway and two people lost their lives
‘समृद्धी’वर चालकाला डुलकी लागली अन दोघांचा गेला जीव, चौघे गंभीर…
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Congress MLA Vikas Thackerays serious allegation contract to company related to purchase of election bonds
काँग्रेस आमदार विकास ठाकरेंचा गंभीर आरोप, निवडणूक रोखे खरेदीशी संबंधित कंपनीला कंत्राट?
Prajwal Revanna in Trouble
‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
SM Mushrif Who killed Karkare
‘करकरेंच्या शरीरात नेमक्या कुणाच्या गोळ्या?’ Who Killed Karkare पुस्तकाचे लेखक एसएम मुश्रीफ म्हणाले…

आरपीएफने एप्रिल महिन्यात सामान गहाळ झाल्याची २६ प्रकरणे नोंदवली. या प्रकरणांचा तातडीने तपास करण्यात आला. चोरी गेलेल्या आणि हरवलेल्या वस्तूंपैकी ७ लाख २१ हजार ९१० रुपये किमतीचे सामान संबंधित प्रवाशांना सुपूर्द करण्यात आले.

आणखी वाचा-काँग्रेस आमदार विकास ठाकरेंचा गंभीर आरोप, निवडणूक रोखे खरेदीशी संबंधित कंपनीला कंत्राट?

प्रवाशांनी मौल्यवान वस्तू नेहमी सोबत ठेवणे, बॅग सुरक्षितपणे लॉक करणे आणि सामान दुर्लक्षित सोडणे टाळणे, असे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाने केले. या सोप्या गोष्टींमुळे रेल्वे प्रवासादरम्यान सामानाचे नुकसान किंवा चोरी रोखण्यासाठी खूप मदत करू शकतात. प्रवासादरम्यान आढळणाऱ्या कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा घटनांची तक्रार तातडीने जवळच्या आरपीएफ, जीआरपी कर्मचारी किंवा तिकीट तपासणीसांकडे करावी, असेही आवाहन मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त मनोजकुमार यांनी केले.