नागपूर : महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पातील एक वीज निर्मिती संच नुकताच बंद पडला होता. त्यापाठोपाठ आता चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातीलही एक वीज निर्मिती संच बंद पडल्याने महानिर्मितीच्या वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे.

राज्यात अवकाळी पावसामुळे तुर्तास विजेची मागणी कमी आहे. परंतु अधून- मधून विजेची मागणी अचानक वाढते. त्यामुळे गरजेनुसार वीज निर्मिती वाढवण्याचे आवाहन वीज कंपन्यांवर असते. त्यातच महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पातील ६६० मेगावॉटचा वीज निर्मिती संच क्रमांक ८ हा बॉयलर ट्यूब लिकेजमुळे १४ मे रोजी बंद पडला होता. हा संच अद्याप सुरू झाला नाही.

Implementation of the ban on POP idols in Mumbai in a phased
मुंबईत पीओपी मूर्तीवरील बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Ethanol, potato, Central Potato Research Institute,
बटाट्यापासून आता इथेनॉल निर्मिती ? जाणून घ्या, केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेचा प्रयोग
semiconductor industry overview extreme ultraviolet lithography in semiconductor industry
चिप-चरित्र : ‘ईयूव्ही’ तर हवं; पण जपान नको…
Gadre Marine Export Pvt Ltd marathi news
टाकाऊ माशांपासून ‘सुरिमी’ उत्पादनाद्वारे कोट्यवधींचा निर्यात व्यवसाय, रत्नागिरीच्या ‘गद्रे मरिन’ची तीन दशकांची यशस्वी वाटचाल
pune fc college parks marathi news
पुणे: स्वमग्न मुलांसाठी ‘फर्ग्युसन’मध्ये उद्यानाची निर्मिती… काय आहे वेगळेपण?
Nagpur, gold prices, gold prices rises in nagpur, silver prices, bullion market, Union Budget,
नागपूर : सोन्याच्या दरात मोठे बदल; ग्राहकांमध्ये चिंता वाढली…
Deonar, bio waste, Ambernath, Deonar Bio Waste Plant, Deonar Bio Waste Plant to Relocate to Ambernath, pollution,
मुंबईचा जैविक कचरा अंबरनाथमध्ये? जांभिवलीच्या औद्योगिक वसाहतीत भूखंड देण्याच्या हालचाली

हेही वाचा…खोदकामात २०० वर्ष जुनी इमारत आढळली; अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात जीर्णोद्धारादरम्यान…

दरम्यान १७ मेच्या रात्री चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातीलही ५०० मेगावॉटचा संच क्रमांक ६ बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद पडला. भर उन्हाळ्यात महानिर्मितीचे दोन महत्वाचे वीज निर्मिती संच बंद पडल्याने कंपनीच्या वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, राज्यात १८ मे रोजी दुपारी १.४५ वाजता विजेची मागणी २६ हजार मेगावॉटच्या जवळपास होती. त्यापैकी महावितरणची मागणी २२ हजार २२० मेगावॉट तर मुंबईची मागणी ३ हजार ७०१ मेगावॉटच्या जवळपास होती. सध्या विजेची मागणी कमी आहे. परंतु अचानक मागणी वाढल्यास पुरवठ्यात अडचणी येण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या विषयावर महानिर्मितीच्या अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले की, एक ते दोन दिवसांत दोन्ही संचांची दुरूस्ती होणार आहे.

हेही वाचा…नागपुरात पुन्हा अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये टोळीयुद्ध….एकाचे घरच पेटवले…..

वीज निर्मितीची सद्यस्थिती

राज्यात शनिवारी (१८ मे) दुपारी १.४५ वाजता सर्वाधिक ७ हजार ३६७ मेगावॉट वीज निर्मिती महानिर्मितीकडून होत होती. त्यात औष्णिक विद्युत प्रकल्पातून ५ हजार ६१० मेगावॉट, उरण गॅस प्रकल्पातून ३६० मेगावॉट, जलविद्युत प्रकल्पातून १ हजार ३३१ मेगावॉट, सौर ऊर्जा प्रकल्पातून ५४ मेगावॉट वीज निर्मितीचा समावेश होता. खासगी प्रकल्पांपैकी अदानीमध्ये १ हजार ८२४, जिंदलमध्ये १ हजार ३६, आयडियलमध्ये २३०, रतन इंडियामध्ये १ हजार ७४, एसडब्लूपीजीएलमध्ये ४४२ मेगावॉट वीज निर्मिती झाली. केंद्राच्या वाट्यातून राज्याला ९ हजार ३४९ मेगावॉट वीज मिळाली.