गडचिरोली : भामरागड येथे क्षयरोगामुळे मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह रुग्णवाहिकेअभावी दुचाकीला खाट बांधून नेण्यात आला. ‘लोकसत्ता’ने याविषयीचे वृत्त प्रकाशित करताच राज्यात खळबळ उडाली. बुधवारी विधानसभेतदेखील आमदार विजय वडेट्टीवार यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून याविषयी प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा… तलाठी भरतीत ‘सेटींग’ होईल का? उमेदवारांकडून विचारणा; १९ लाखांचा दर अन्…

now expelled Bikaner unit president Usman Gani
पंतप्रधान मोदींच्या मुस्लिमांबद्दलच्या ‘त्या’ विधानावर भाजपातील नेत्याचाच घरचा आहेर; नेमकं प्रकरण काय?
mahayuti in campaign, Mahavikas Aghadi,
महायुतीतील दिग्गज प्रचारात, तर महाविकास आघाडीत मोठ्या सभेची प्रतीक्षाच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौथ्यांदा यवतमाळात येणार
lok sabha 2024, devendra fadnvis, vijay Wadettiwar, devendra fadnvis not criticise vijay Wadettiwar, vijay Wadettiwar not criticise devendra fadnvis , vijay Wadettiwar bjp entry, dharmrao baba aatram, vijay Wadettiwar bjp entry discussions, congress, state opposition leader
देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवारांचे प्रचारादरम्यान एकमेकांबद्दल मौन का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन

हेही वाचा… Maharashtra Monsoon Session 2023 Live : टोलनाक्याची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांचं अमित ठाकरेंकडून कौतुक; म्हणाले, “माझ्यासाठी अंगावर…”

२० जुलै रोजी भामरागड तालुक्यातील कृष्णार येथील रहिवासी असलेला गणेश तेलामी या २३ वर्षीय क्षयरोगग्रस्त आदिवासी युवकाचा हेमलकसा येथे मृत्यू झाला. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने नातेवाईकांनी मृतदेह दुचाकीला खाट बांधून नेला. याविषयीचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित करताच पाच दिवसांनंतर खळबळून जागे झालेल्या आरोग्य विभागाने कृष्णार येथे चमू पाठवून मृत युवकाच्या कुटुंबीयांची भेट घेत विचारपूस केली. दरम्यान, बुधवारी आमदार विजय वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून त्या भागात खनिज निधीतून शववाहिका उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली. समाजमाध्यमावर तरुणाचा मृतदेह दुचाकीला खाट बांधून नेत असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.