भामरागड तालुक्यातील कोठी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आला. २२ विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे दाखल करण्यात आले असून त्यापैकी ७ जणांना विषबाधा झाल्याचे निदान झाले, तर उर्वरित विद्यार्थ्यांना प्राथमिक तपासणीनंतर घरी पाठविण्यात आले.

शासकीय आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाकडून निवासासोबत जेवणाचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, येथील काही विद्यार्थ्यांनी गावातील नातेवाईकांकडून अंबाडीची भाजी आणली व जेवताना मित्रांमध्ये वाटली. शाळेत गेल्यानंतर ७ विद्यार्थिनींना पोटदुखी, उलट्या झाल्याने त्यांना लगेच डॉक्टरांकडे नेण्यात आले.

Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक

हेही वाचा: पंतप्रधानांच्या हस्ते फक्त समृद्धीचं नव्हे तर……

प्राथमिक तपासणीनंतर सर्व विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरक्षेचा उपाय म्हणून शाळेतील १५ विद्यार्थ्यांनादेखील प्राथमिक तपासणीसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी ७ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे निदान झाले, तर उर्वरित १५ विद्यार्थ्यांना मंगळवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, असे भामरागडचे प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी नातेवाईकांकडून आणलेल्या अंबाडीच्या भाजीतून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.