लोकसत्ता टीम

बुलढाणा : मुंबईत आज, बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय शासकीय बैठकीत बहुतांश मागण्या मान्य झाल्याने आणि उर्वरित मागण्यांची पूर्तता महिनाभरात करण्याचे ठोस आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपले मंत्रालय ताब्यात आंदोलन मागे घेतले आहे. यावेळी तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनही मागे घेतले.

Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
minorities targeted in bjp ruled states deeply troubling congress slams bulldozer action in mp
बुलडोझर न्याय अमान्य! अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे व्यथित करणारे; घरे पाडणे थांबवण्याची काँग्रेसची मागणी
Mumbai, Sanjay Gandhi National Park, slum rehabilitation, High Court order, illegal encroachments, forest management, state government,
राष्ट्रीय उद्यान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश, बेकायदा झोपडीधारकांच्या तातडीच्या पुनर्वसनासाठी धोरण आखण्याबाबत सूचना
Thane, Badlapur, Shambhuraj Desai,Investigation into Violent Badlapur Railway Protest, railway protest,
बदलापुरातील रेल रोको आंदोलनाची चौकशी केली जाणार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
cm eknath shinde meeting with employee unions of bandra government colony over rehabilitation
वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांचे अन्यत्र पुनर्वसन; भूखंडासाठी अर्ज करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
Eknath Shinde, Badlapur, Ladki Bahin Yojana,
लाडकं सरकार लक्षात ठेवा! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
Devendra Fadnavis alleged says mahavikas aghadi try to arrest me by authorities
“माझ्या अटकेसाठी मविआने अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती…”, फडणवीस यांचा आरोप

उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदारद्वय राजेंद्र शिंगणे, संजय कुटे आणि तुकाराम मुंडे, अनुप कुमार यांच्यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते. तुपकरांनी मांडलेल्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या. सोयाबीन-कापूस प्रश्नाबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत येत्या आठ दिवसांत दिल्लीत बैठक बोलावली जाणार आहे. बैठकीला तुपकरदेखील उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना तुपकर म्हणाले की, सरकारशी सकारात्मक चर्चा झाली आहे. काही मागण्या पंधरा दिवसांत, काही मागण्या महिनाभरात मार्गी लावण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

आणखी वाचा-भाचीच्या लग्नावरून परतताना अपघात, निवृत्त शिक्षकाचा पत्नीसह मृत्यू

शेतमजुरांसाठी स्वतंत्र महामंडळ

शेतमजुरांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत केली. या महामंडळामार्फत शेतमजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा व आजाराचा खर्च केला जाणार आहे.