अमरावती: विद्यार्थी त्‍यांच्‍यासाठी स्‍वत: किंवा पालकामार्फत अनेक महाविद्यालयांमध्‍ये प्रवेशासाठी अर्ज करतात, अशावेळी महाविद्यालये त्‍यांच्‍याकडून प्रवेश अर्जासह माहिती पुस्तिका घेणे बंधनकारक करतात, या अर्ज आणि पुस्तिकांसाठी शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत शुल्‍क आकारण्‍यात येत असल्‍याने विद्यार्थी आणि पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पुढील उच्च शिक्षणासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत आहेत. त्यासाठी महाविद्यालयाचा प्रवेश अर्ज भरून देणे गरजेचे असते. प्रवेश अर्जासोबतच माहितीपुस्तिका सुद्धा विद्यार्थ्यांना दिल्या जाते. परंतु प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिकांचे शुल्क यावर्षी १५० रूपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे.

हेही वाचा… प्रफुल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीत खिंडार, ‘मी साहेबांसोबत…’ म्हणत शरद पवार निष्ठावंताची विश्रामगृहात आज बैठक

एका विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयातून माहितीपुस्तिका खरेदी केली तेथेच त्याला प्रवेश मिळेल, याची खात्री नसते. त्यामुळे एकाचवेळी किमान दोन-तीन महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज भरावा लागतो. अशा स्थितीत महागड्या माहितीपुस्तिका घ्यायच्या कशा, असा प्रश्न सामान्य विद्यार्थ्यांपुढे उभा ठाकला आहे.हा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने त्याकडे लक्ष वेधून शुल्क नियंत्रित करावे, असे विद्यार्थ्‍यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा… परिवहन खात्यातील भ्रष्टाचार; मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या आता संगणकीय प्रणालीद्वारे

माहितीपुस्तिका खरेदी करताना दमछाक झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनकडे तक्रारी नोंदवल्या. त्यानंतर संघटनेने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्‍या कुलगुरूंना निवेदनाद्वारे सत्यता लक्षात आणून देत विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी केली आहे. या निवेदनात छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या देणगी प्रथेचासुद्धा उल्लेख करण्यात आला असून विद्यापीठाने अशा महाविद्यालयांविरुद्ध कडक पावले उचलावी, असे म्हटले आहे.

हेही वाचा… चंद्रपूर जिल्ह्यात ४ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या; पावसाची हुलकावणी; दुबार पेरणीचे संकट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी एआयएसएफच्या राज्य कौन्सिल सदस्य कॉ. प्रतिक्षा ढोके, अमरावती जिल्हाध्यक्ष धीरज बनकर, जिल्हा सचिव योगेश चव्हाण, शहर सचिव चैतन्य कलाने, वेदिका मरगडे, ईश्वर शिंदे, संध्या मेटकर, ओम कळंबे आदी विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.