चंद्रशेखर बोबडे

नागपूर : मागील तीन वर्षांत सरकारी योजनेतून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेणा-या मुलांपैकी दैशात साठ टक्के तर राज्यात ७० टक्केच मुलांना रोजगार संधी मिळाली. सरासरी ३० ते ४० टक्के प्रशिक्षित तरूण रोजगाराच्या शोधात आहेत.

Reduce waiting period for case paper Mumbai Municipal Commissioner Bhushan Gagrani directs KEM Hospital administration
केसपेपरसाठीचा प्रतीक्षा कालावधी कमी करा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे केईएम रुग्णालय प्रशासनाला निर्देश
number of agri startups jumps in india
कृषी नवउद्यमी नऊ वर्षांत सात हजारांवर
asha workers, asha workers did not get salary, state government, Maharashtra state government, asha workers did not get salary 4 months, asha workers Maharashtra,
आशा सेविका चार महिने मानधनापासून वंचित
Dilemma of onion growers for 14 months in last five years
गेल्या पाच वर्षांतील १४ महिने कांदा उत्पादकांची कोंडी
nashik municipal corporation schools marathi news, 1000 rupees saree nashik teachers marathi news
नाशिक मनपा शाळांमध्ये पोषाख संहितेची तयारी, शिक्षिकांकडून प्रतिसाडी एक हजार रुपयांचे संकलन
houses, Mulund,
१४ वर्षांपासून घरांची प्रतीक्षा, मुलुंडमधील गृहप्रकल्पाचे केवळ २५ टक्केच काम पूर्ण
challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार

ग्रामीण भागातील १५ ते ३५ वयोगटातील तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ग्रामीण दीनदयाल उपाध्याय कौशल्य योजना सुरू केली. मागील तीन वर्षात या योजनेतून देशपातळीवर १३ लाख ८८ हजार ८०० तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी ८ लाख २४ हजार १६२ (५९.३४ टक्के) तरुणांना रोजगार संधी मिळाली.

हेही वाचा >>> नागपुरात उष्माघाताचे तीन बळी? शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

महाराष्ट्रात ४९ हजार १३४ तरुणांनी प्रशिक्षण घेतले, त्यापैकी ३४ हजार १७८ (६९.५६ टक्के) जणांच्या हातांना काम मिळाले. उर्वरित( देश पातळीवर ४० टक्के तर राज्य पातळीवर ३० टक्के ) प्रशिक्षित तरूण रोजगारापासून वंचित आहेत, असे सरकारच्याच आकडेवारीतून स्पष्ट होते. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी यासंदर्भात संसदेत मुद्दा मांडला होता. ग्रामीण भागातील किती तरुणांना या योजनेचा लाभ झाला याबाबत तपशील त्यांनी मागितला होता.

ग्रामीण कौशल्य योजना

क्षेत्र       प्रशिक्षणार्थी  रोजगार    टक्के

देशात-  १३,८८,८००  ८,२४,१६२  ५९.३४

महाराष्ट्र    ४९,१३४      ३४,१७८ ६९.५६