गोंदिया : ओबीसी आणि मराठा वाद हा सरकारनिर्मित आहे. सरकारकडून हा वाद मुद्दाम घडवून जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचे काम केले जात आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. काँग्रेसला या वादात पडायचे नाही. राज्यात आणि देशात महागाई, बेरोजगारीसारखे ज्वलंत प्रश्न असताना त्याकडे कोणाचे लक्ष नाही. मूळ मुद्यावर लक्ष केंद्रित करून सरकारला ते मुद्दे सोडवायला भाग पाडण्याचे काम काँग्रेस करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे जिल्हा महिला मेळाव्यासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते. मंत्री छगन भुजबळ यांचे नाभिक समाजाबाबतचे वक्तव्य संवैधानिक व्यवस्थेचा अपमान करणारे आहे. नाभिक समाज महत्त्वपूर्ण घटक असून त्या समाजाचा कोणी अपमान करत असेल तर, त्याचा आम्ही निषेध करतो. सरकारनेदेखील या संदर्भात गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करायला हवी. या सरकारने जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी, अशा शब्दात पटोले यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत सरकारवरही घणाघात केला.

loksatta analysis centre lifts ban on govt staff joining rss activities
विश्लेषण : केंद्र सरकार दक्ष… कर्मचाऱ्यांची संघबंदी मागे घेण्याचा अर्थ काय?
Jayant Patil On Ajit Pawar
“मोदी सरकारच्या घोषणा म्हणजे वाऱ्यावरची वरात”; अर्थसंकल्पावरून जयंत पाटलांचं टीकास्र; म्हणाले, “राज्यातल्या खासदारांनी…”
Raola government central unstable Criticism of Mamata Banerjee
केंद्रातील राओला सरकार अस्थिर; ममता बॅनर्जीं यांची टीका
priyanka gandhi on sanvidhaan hatya diwas,
संविधान हत्या दिनाच्या निर्णयावरून प्रियांका गांधींचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाल्या, “ज्यांनी संविधानाच्या अंमलबजावणीला…”
sanjay raut on sanvidhaan hatya diwas
VIDEO : “…तर अटल बिहारी वाजपेयींनीही आणीबाणी लागू केली असती”, संविधान हत्या दिनाच्या निर्णयावरून संजय राऊतांचं टीकास्र!
shambhuraj desai 10 percent maratha reservation
राज्यातील १० टक्के मराठा आरक्षण टीकवण्यासाठी सरकार काय प्रयत्न करणार? शंभूराज देसाईंचं थेट उत्तर; म्हणाले…
amol kolhe
“केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं”, लोकसभेतील पहिल्याच भाषणात अमोल कोल्हेंची मागणी; म्हणाले…
Uddhav Thackeray opinion that besides the Ladki Bahin scheme announce the scheme for the brothers too
‘लाडकी बहीण’बरोबरच भावांसाठीही योजना जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

हेही वाचा – महात्मा जोतीराव फुले यांना भारतरत्न कशाला? छगन भुजबळ स्पष्टच म्हणाले…

हेही वाचा – “माझ्या नॅपकिनमध्ये जादू आहे, ती…”, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला भरत गोगावलेंचं उत्तर

‘मतांच्या राजकारणासाठी सत्ताधाऱ्यांकडून रामनामाचा गजर’

मतांच्या राजकारणासाठी सत्ताधाऱ्यांकडून श्रीरामनामाचा मतलबी गजर सुरू आहे. भगवान श्रीराम आमच्या हृदयात आहेत, जेव्हा महात्मा गांधींची हत्या झाली, तेव्हा गांधीजींनी ‘हे राम’ हे शब्द उच्चारूनच आपला देह सोडला. एकीकडे महागाई, बेरोजगारी आकाशाला भिडली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून देशात आणि राज्यात सत्ताधाऱ्यांच्या आमदार व खासदारांकडून महिलांवर अत्याचार वाढत आहेत भरदिवसा गोळीबार, गुंडगिरी माजवून सामान्यांना छळले जात आहे, असा आरोप नाना पटोले यांनी अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती महाविद्यालयात रविवारी आयोजित जिल्हा काँग्रेस महिला मेळाव्याला संबोधित करताना केला.