करोना’च्या पार्श्वभूमीवर ‘माफसू’तील (महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ) विद्यार्थ्यांची ऑनलाईन मौखिक परीक्षा घेत पहिल्या तीन वर्षांच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात तात्पुरता प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, स्थिती पूर्वपदावर आल्यावर विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणारच असा स्पष्ट निर्णय घेण्यात आला असून तो राज्यपालांकडे अंतिम परवानगीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘माफसू’मधील अभ्यासक्रम हे भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या निकषांवर आधारित आहे. त्यामुळे परीक्षा प्रणालीत बदलासाठी परिषदेतर्फे सुधारित दिशानिर्देश जारी झाल्याशिवाय पुढील पावले उचलता येणार नाहीत. यासंदर्भात देशभरातील विविध विद्यापीठांनी परिषदेला पत्र लिहिले होते. मात्र दिशानिर्देश जारी झाले नसल्याने प्रशासन व विद्यार्थ्यांंमधील संभ्रम वाढला होता. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाचे सहसचिव उपमन्यू बसू यांनी संबंधित सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार पशुवैद्यकीय विद्यापीठे व महाविद्यालये विद्यार्थ्यांचे ‘ऑनलाईन’ वर्ग घेऊ शकतात. शिवाय विद्यार्थ्यांना विविध विषयांचा ‘ई-डाटाबेस’ उपलब्ध करून देण्यात यावा. सोबतच प्रत्येक वर्गानंतर ‘ऑनलाईन असायनमेंट’ देण्यात यावी. टाळेबंदी आणखी शिथिल झाल्यानंतर प्रात्यक्षिकांचे वर्ग घेण्यात यावे, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. या सूचनांनुसार नुकतीच ‘माफसू’च्या विद्वत परिषदेत परीक्षेसंदर्भात चर्चा करण्यात आली. सभेमध्ये आलेल्या विविध सूचनानंतर विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणे संयुक्तिक नसल्याने  स्थिती पूर्ववत झाल्यावर परीक्षा घ्याव्या, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पहिल्या तीन वर्षांच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन मौखिक परीक्षा घेत त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे.

Group University Scheme, Lukewarm Response, Maharashtra, Only Two Proposals Submitted, Group University Scheme low response, Group University Scheme maharashtra, Department of Higher and Technical Education maharashtra,
समूह विद्यापीठ योजनेला राज्यभरातून अल्प प्रतिसाद
loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती?
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात

विद्वत परिषदेमध्ये परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यात आला असून तो राज्यपालांकडे अंतिम परवानगीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यांची परवानगी मिळताच तो जाहीर केला जाईल.

– डॉ.ए.पी. सोमकुंवर पशुवैद्यकीयशास्त्र अधिष्ठाता