लोकसत्ता टीम

चंद्रपूर : महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. अमृत योजनेच्या पाईपलाईनचे काम ५५० असून त्यांचे निम्मे काम झाले असतांना ४५० किलोमीटरचे बिल काढण्यात आले. त्यातून प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे.पाण्याच्या टाक्यांचे निकृष्ट बांधकाम झाले आहे. अमृतची एसआयटी किवा निवृत्त न्यायाधीश मार्फत चोकशी करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Pune potholes, Pune Municipal Commissioner,
पुणे : खबरदार… खड्डे न बुजविणाऱ्या मंडळांना आयुक्तांचा इशारा
nana patole criticized shinde govt
Nana Patole : ‘महाराष्ट्र बंद’च्या मुद्द्यावरून नाना पटोलेंचं शिंदे सरकारवर टीकास्र; म्हणाले, “बगलबच्च्यांना न्यायालयात पाठवून…”
Bombay High Court restrained the constituent parties of the Mahavikas aghadi from calling a close Maharashtra to protest the Badlapur school case
बंदला प्रतिबंध, मविआतील पक्षांना उच्च न्यायालयाचा मज्जाव; बदलापूर अत्याचाराविरोधात आज राज्यभर मूक आंदोलन
Aditya Thackeray
मविआ सत्तेत आल्यावर लुटारु मंत्री, अधिकाऱ्यांना कारागृहात टाकणार; आदित्य ठाकरे यांचा इशारा
namo shetkari mahasamman yojana marathi news
महिलांपाठोपाठ शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न, सव्वा कोटी लाभार्थींना महासन्मान योजनेचा चौथा हप्ता
Kirit Somaiya probe ins vikrant
Kirit Somaiya: आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचा किरीट सोमय्यांना धक्का; चौकशी आवश्यक असल्याचे दिले आदेश

अमृतचे काम करताना कंत्राटदाराने दुय्यम दर्जांची पाईपलाईन असल्यामुळे १६ प्रभाग पैकी १२ प्रभागातील हजारो घरात पाणी आले नाही. त्यामुळे शहरावर जलसंकट आहे. असे असतांना नव्याने ३८० कोटीची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.

आणखी वाचा-विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक डुप्लिकेट ओबीसींची…

त्यामुळे प्रशासक व त्याला साथ देणाऱ्या मंडळीसाठी महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचा घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला. तसेच पालिकेत कंत्राटी पद्धतीने घनकचरा उचलण्याचे काम सुरू असून निविदा न काढताच काम दिण्यात आले आहे. त्यामुळे यातसुध्दा मोठा भ्रष्टाचार झाला आहे. पालिकेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून दरमहाव वसुलीचे काम सुरू असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली. वैद्यकीय महाविद्यालय जनावरांचा गोठा झाला असून महाविद्यालयात आवश्यक त्या औषधे व यंत्र सामुग्री उपलब्ध नाही.

आणखी वाचा-चंद्रपूर : गटशिक्षणाधिकारी खंडाळे एसीबीच्या जाळ्यात

वरिष्ठ डॉक्टर रूग्णालयात हजर राहत नाही. रूग्णालय कनिष्ठ व शिकाऊ डॉक्टराच्या भरोश्यावर सुरू आहे. २३६ सुरक्षारक्षक आवश्यक असताना केवळ ४५ सुरक्षा रक्षक कार्यरत आहे. त्यामुळे डॉक्टरांवर हल्ले होत आहे. त्यामुळे डॉक्टरांना आंदोलन करावे लागत आहे. ५०१ कंत्राटी पदापैकी ३३८ पदे भरली गेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. त्यामुळे तातडीने पदे भरण्यात यावी. याकडे तिघांडी सरकारचे लक्ष नसून हे सरकार लोकांसाठी नाही तर केवळ कंत्राटदारासाठी असून तिजोरी लुटण्यावर भर असल्याचेही ते म्हणाले.पत्रकार परिषदेला नंदू नागरकर, राजेश अडुर, कुणाल चहारे उपस्थित होते.