लोकसत्ता टीम

चंद्रपूर : महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. अमृत योजनेच्या पाईपलाईनचे काम ५५० असून त्यांचे निम्मे काम झाले असतांना ४५० किलोमीटरचे बिल काढण्यात आले. त्यातून प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे.पाण्याच्या टाक्यांचे निकृष्ट बांधकाम झाले आहे. अमृतची एसआयटी किवा निवृत्त न्यायाधीश मार्फत चोकशी करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
mumbai High Court urged bmc and State Government to declare they are unable to solve illegal hawkers issue
…तर असमर्थ असल्याचे तरी जाहीर करा ! बेकायदा फेरीवाल्यांच्या समस्येवरून उच्च न्यायालयाचे महापालिका, सरकारला खडेबोल
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
Meter inspector suspended in bribery case
पिंपरी : लाच प्रकरणातील मीटर निरीक्षक निलंबित
purchase of educational systems will be done through tendering Municipal Corporations Education Department clarified
टीका होताच महापालिका नरमली, निविदा काढूनच होणार शैक्षणिक प्रणालीची खरेदी!
Supreme Court order regarding the dispute over a private well near the entrance of Sambhal Jama Masjid
संभलमधील स्थिती ‘जैसे थे’, न्यायालयाचा आदेश; विहिरीबाबत कार्यवाही करण्यास मज्जाव
Shiv Sena Thackeray group Nashik municipal elections
नाशिक महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार

अमृतचे काम करताना कंत्राटदाराने दुय्यम दर्जांची पाईपलाईन असल्यामुळे १६ प्रभाग पैकी १२ प्रभागातील हजारो घरात पाणी आले नाही. त्यामुळे शहरावर जलसंकट आहे. असे असतांना नव्याने ३८० कोटीची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.

आणखी वाचा-विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक डुप्लिकेट ओबीसींची…

त्यामुळे प्रशासक व त्याला साथ देणाऱ्या मंडळीसाठी महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचा घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला. तसेच पालिकेत कंत्राटी पद्धतीने घनकचरा उचलण्याचे काम सुरू असून निविदा न काढताच काम दिण्यात आले आहे. त्यामुळे यातसुध्दा मोठा भ्रष्टाचार झाला आहे. पालिकेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून दरमहाव वसुलीचे काम सुरू असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली. वैद्यकीय महाविद्यालय जनावरांचा गोठा झाला असून महाविद्यालयात आवश्यक त्या औषधे व यंत्र सामुग्री उपलब्ध नाही.

आणखी वाचा-चंद्रपूर : गटशिक्षणाधिकारी खंडाळे एसीबीच्या जाळ्यात

वरिष्ठ डॉक्टर रूग्णालयात हजर राहत नाही. रूग्णालय कनिष्ठ व शिकाऊ डॉक्टराच्या भरोश्यावर सुरू आहे. २३६ सुरक्षारक्षक आवश्यक असताना केवळ ४५ सुरक्षा रक्षक कार्यरत आहे. त्यामुळे डॉक्टरांवर हल्ले होत आहे. त्यामुळे डॉक्टरांना आंदोलन करावे लागत आहे. ५०१ कंत्राटी पदापैकी ३३८ पदे भरली गेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. त्यामुळे तातडीने पदे भरण्यात यावी. याकडे तिघांडी सरकारचे लक्ष नसून हे सरकार लोकांसाठी नाही तर केवळ कंत्राटदारासाठी असून तिजोरी लुटण्यावर भर असल्याचेही ते म्हणाले.पत्रकार परिषदेला नंदू नागरकर, राजेश अडुर, कुणाल चहारे उपस्थित होते.

Story img Loader