वर्धा : ग्राम विकास विभागातर्फे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील तीस संवर्गात १९ हजार ४६० पदे सरळ सेवेने भरल्या जात आहे. इच्छुकांना २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ही संपूर्ण प्रक्रिया आयबीपीएस कंपनीतर्फे करण्यात येत आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. जिल्हा परिषदांना परीक्षेचे केंद्र बदलण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

हेही वाचा – भाजपा नेत्या सना खानच्या खुनामागे नेमके कारण काय? मृतदेहाचा नव्याने शोध सुरू

Excise department, adulteration,
बारमधील मद्यभेसळीविरोधात उत्पादन शुल्क विभाग सज्ज! प्रत्येक विभागाला दोन मोजणी यंत्रे वितरित
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?

हेही वाचा – राज्यात विजेची मागणी पुन्हा वाढली

कोणतीही जिल्हा परिषद एखादे केंद्र रद्द करू शकते. तसेच गरजेनुसार केंद्रात वाढही करू शकते. उमेदवारांनी पर्याय म्हणून दिलेल्या केंद्राव्यतिरिक्त जिल्हा परिषदेकडून इतरही केंद्र दिले जावू शकतात, असे कंपनीतर्फे खबरदार करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन परीक्षेच्या तारखेबाबत उमेदवारांनी सातत्याने जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ पाहण्याची सूचना आहे. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरल्याच्या पावतीची प्रिंट जपून ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही अडचण आल्यास त्याची गरज पडू शकते.