नाशिक : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना थकबाकीचा भरणा करून दंडात सवलत देण्यासाठी जाहीर झालेल्या विलासराव देशमुख अभय योजनेचा जिल्ह्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या एक लाख ४२ हजार २२८ ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. त्यांच्याकडे ८५ कोटी ३८ लाखांची मूळ थकबाकी असून त्यावरील व्याज आणि दंड रकमेत ११ कोटी ९२ लाख रुपयांची सवलत तसेच पुनजरेडणीची संधी मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्व संधी देऊनही वीज देयक न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करावा लागतो. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांकडील थकबाकी वसूल होईल व ग्राहकांना लाभ मिळेल, या हेतूने ही योजना जाहीर केली आहे. १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२२ हा या योजनेचा कालावधी आहे. कृषी ग्राहक वगळता सर्व वर्गवारीतील ग्राहकांना ती लागू असेल. योजनेत थकबाकीदार ग्राहकांना थकबाकीची  मूळ रक्कम एकरकमी भरावी लागेल. त्यामुळे त्यांच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येईल.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhay electricity opportunity lakh electricity consumers free arrears through scheme amy
First published on: 24-03-2022 at 04:53 IST