नाशिक : महायुतीत नाशिकच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा तीनही पक्षांच्या नेतेमंडळींच्या एकत्रित बैठकीनंतर सुटेल, असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

महात्मा फुले जयंतीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना, भुजबळ यांनी भाजपकडून कमळाच्या चिन्हावर ही जागा लढविण्याचा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचा पुनरुच्चार करतानाच, नाशिकची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागितली असता दिल्लीतून ही जागा घ्या, पण भुजबळ यांना उमेदवारी द्या, असे सांगण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून ही माहिती आपल्याला समजली. यामागे नेमके काय समीकरण आहे, हे सांगता येत नाही, असा दावाही भुजबळ यांनी केला.

nashik lok sabha,
नाशिकमध्ये महायुतीत अचानक शांतता
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

हेही वाचा >>>मालेगावात नमाज पठणवेळी पॅलेस्टाईनचा झेंडा फडकला

तीनही पक्षांच्या दावेदारीमुळे नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करून प्रचाराला वेग दिला असताना दुसरीकडे दोन आठवडे उलटूनही महायुतीत बेबनाव सुरू आहे. शिंदे गट ही जागा सोडण्यास तयार नसताना भाजप आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी या जागेसाठी आग्रही आहेत. यासंदर्भात विचारणा करण्यात आली असता, भुजबळ यांनी महायुतीतील प्रमुख नेते एकत्र बसून चर्चा करतील, तेव्हा हा तिढा सुटेल, असे सूचित केले. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पािठबा दिल्याने महायुतीची ताकद निश्चितपणे वाढणार आहे. एक कार्यकर्ता पक्षात आला तरी आपल्याला आनंद होतो. राज ठाकरे हे मनसेचे प्रमुख आहेत. महाराष्ट्रात त्यांचे नाव आहे. जनमानसावर त्यांचा प्रभाव आहे. ठाकरे यांनी पािठबा दिल्याने महायुतीची ताकद विस्तारणार असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.