प्रगतशील शाळा, ज्ञानरचना वाद, प्रगत महाराष्ट्र अभियान यासह ‘ई-लर्निग’ वर भर देत शिक्षण विभाग शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आग्रही आहे. काही वर्षांत सातत्याने कमी होणारी पटसंख्या पाहता जिल्ह्य़ात शिक्षण विभागाने ‘गुढीपाडवा-प्रवेश वाढवा’ अभियानाला सुरूवात केली आहे. या अंतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या मदतीने विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढविण्याचे आवाहन सध्या जिल्हा परिषद शाळांसमोर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीसाठी तीन हजार २०० शाळा असून या ठिकाणी दोन लाख ७५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आनंददायी शिक्षण, ज्ञानरचनावाद, प्रगत महाराष्ट्र, सिध्द शाळा यासह ई-लर्निग असे विविध उपक्रम जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरू आहेत.  काही ठिकाणी लोकसहभागातून ई लर्निग साहित्य मिळाल्याने दुर्गम अशा भागातही मुले नियमितपणे शाळेत येत आहेत. असे असतांना पेठ, दिंडोरी, सुरगाणा, कळवण, नांदगाव या तालुक्यांसह शहरातील काही ठिकाणी आजही स्थलांतर किंवा अन्य काही अडचणींमुळे विद्यार्थी पटसंख्येत वाढ झालेली नाही. काही ठिकाणी त्यात कमालीची घट होत आहे. ही पटसंख्या वाढविण्यासाठी आता शिक्षण विभागाने ‘गुढीपाडवा-प्रवेश वाढवा’ हे अभियान हाती घेतले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Department of education student attendance e learning
First published on: 16-03-2018 at 02:23 IST