मनमाड – शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गावर शहरात नवीन उड्डाणपूल उभारणे आणि याच मार्गाला शहराच्या बाहेरून वळण रस्ता करण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले.

बुधवारी मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या इंदूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूल खचल्याने या मार्गावरची संपूर्ण वाहतूक तीन दिवसांपासून बंद आहे. सर्व वाहतूक वेगवेगळ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. या खचलेल्या उड्डाण पुलाची शुक्रवारी डाॅ. भारती पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. रेल्वे उड्डाण पुलाचा खचलेला कठडा आणि भाग तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पुलाच्या इतर भागांचे संरचनात्मक लेखापरीक्षण करून दुरुस्तीचे काम हाती घेण्याच्या सूचना केल्या.

Shahad flyover, MMRDA, four lane flyover,
शहाड उड्डाणपुलाची कोंडी फुटणार, एमएमआरडीएकडून निविदा जाहीर, चारपदरी उड्डाणपूल होणार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Protest of students, traffic jam, chinchoti road,
वसई : वाहतूक कोंडीपासून त्रस्त विद्यार्थी व भूमिपुत्रांचे आंदोलन, महामार्ग व चिंचोटी रस्त्याच्या समस्येबाबत संताप
Mumbai, Speed ​​limit,
मुंबई : राम मंदिर – गोरेगाव – मालाड विभागात वेगमर्यादा
Vasai, Pedestrian bridge work, National Highway,
वसई : राष्ट्रीय महामार्गावर पादचारी पुलांची कामे अंतिम टप्प्यात, रस्ते ओलांडून होणारे अपघात रोखणार
Traffic changes in Thane Kalyan Bhiwandi on the occasion of Anant Chaturdashi
ganpati Visarjan 2024 : ठाणे, कल्याण, भिवंडीत वाहतुक बदल
Mumbai-Bengaluru journey now faster 14-lane highway to be made
मुंबई-बेंगळुरू प्रवास आता अधिक वेगवान, होणार १४ पदरी महामार्ग
Shiv-Panvel highway, Shiv-Panvel highway potholes ,
मुंबई : शीव-पनवेल महामार्ग खड्ड्यांतच

हेही वाचा – छापील वीज देयकास ४० हजार ग्राहकांचा नकार; पर्यावरणस्नेही मार्गाचा अवलंब

हेही वाचा – सौद्यानंतर एक दिवस आधी कोसळलेल्या पावसाने शेतकरी उदध्वस्त; अवकाळीने हंगामपूर्व द्राक्षांचे मोठे नुकसान

या जागेवर नवीन उड्डाणपूल आणि वळण रस्त्याबाबत गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी करणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. उड्डाण पुलाचा कठडा खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे. ती अन्यत्र मार्गाने वळवण्यात आली आहे. शिवाय दोन भागांना जोडणारा हा उड्डाण पूल असल्याने नागरी वस्तीच्या मोठा भागाचा संपर्क खंडित झाला आहे. परिणामी पादचारी आणि वाहनचालकांची गैरसोय होत आहे. याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ व नितीन पांडे, शहराध्यक्ष संदीप नरवडे, सचिन संघवी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील, रेल्वे व बांधकाम विभागाचे अधिकारी व पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.