‘दो बूंद जिंदगी के’ असे जाहिरातीद्वारे कितीही सांगितले जात असले तरी लसीकरणाविषयी कमालीची अनास्था असल्याने आरोग्य विभागाला वारंवार ‘मिशन इंद्रधनुष्य’ हाती घेण्याची वेळ येत आहे. या उपक्रमांतर्गत यंदाच्या वर्षी चार टप्प्यात हा उपक्रम राबविला जाणार असून त्याबाबत कृती आराखडा, नियोजन अंतिम टप्पात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बालकांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी वेगवेगळी सुई, लसीकरण करण्यात येते. विशेषत शून्य ते सहा वयोगटातील अन् त्यामध्येही पहिल्या पाच वर्षांत बालकांमध्ये होणारे लसीकरण महत्वाचे ठरते. संसर्गजन्य आजार किंवा दुर्धर आजाराची लागण होत बालमृत्यू होऊ नये याकरीता हे लसीकरण महत्वाची भूमिका निभावते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mission rainbow for vaccination in final stage
First published on: 06-04-2017 at 02:45 IST