नाशिक – केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेत जिल्ह्यातील २४ हजार ९८२ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) प्रकाश अहिरे यांनी दिली आहे.

हेही वाचा – “कधी पावसात भिजणे, कधी रडणे, कधी आजारी पडणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न”, गिरीश महाजनांची टीका

in nashik 52 criminals deported from Police Commissionerate
नाशिक : पोलीस आयुक्तालयाकडून ५२ गुन्हेगार तडीपार
Developers benefit from the sludge of Gangapur Demand to stop silt removal work due to leaving farmers
‘गंगापूर’च्या गाळातून विकासकांचे भले? शेतकऱ्यांना डावलल्याने गाळ काढण्याचे काम बंद करण्याची मागणी
students died in road accident in jalgaon
जळगाव जिल्ह्यातील अपघातात तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू
eknath shinde criticized uddhav thackeray
“बाळासाहेबांना यांची क्षमता माहिती होती, त्यामुळेच…”; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका!
dindori lok sabha marathi news, dindori lok sabha marathi news, babu bhagare tutari marathi news
दिंडोरीत बाबू भगरे अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह, मविआच्या भास्कर भगरे यांना त्रासदायक
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Candidates struggle to get their name on the ballot paper in Nashik
नाशिकमध्ये मतपत्रिकेत नाव वरती येण्यासाठी उमेदवारांची धडपड
govind dev giri maharaj latest marathi news
स्वामी गोविंददेवगिरी महाराजांना रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार; नाशिकमध्ये नागरी सत्कार, गंगा गोदावरीची महाआरती

हेही वाचा – शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीने महायुतीच्या अडचणीत भर

या परीक्षेसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी साक्षरता वर्ग घेण्यात आले. स्थलांतरीत, शेतमजूर तसेच अन्य प्रौढ व्यक्तींना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले. या प्रौढ साक्षरता वर्गाची १७ मार्च रोजी परीक्षा झाली. कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील दोन हजार ६८६ केंद्रावर असाक्षर परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती. एकूण २४ हजार ९८२ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून २३३ परीक्षार्थींना सुधारणा आवश्यक म्हणून घोषित करण्यात आले आहे. उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम नियामक समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व कार्यकारी समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे अहिरे यांनी नमूद केले आहे.